HomeArchiveट्रॉम्बे ते गेट...

ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

Details
ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”
 
“केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content