HomeArchiveट्रॉम्बे ते गेट...

ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

Details
ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू करा! खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”
 
“केएचएल ब्युरो

वाहनांची वाढती संख्या, होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे होणारे वायुप्रदूषण आणि शहराच्या रस्त्यांवर पडणारा अतिरिक्त ताण यावर उपाय म्हणून मानखुर्दजवळच्या ट्रॉम्बे येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्याकडे केली आहे.

हा जलवाहतुकीचा मार्ग लवकरात लवकर सुरू करून त्यानंतर शहरांतर्गत जलवाहतुकीसाठी नवे पर्यायही शोधण्याची गरज असल्याचे शेवाळे यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नमूद केले. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत दररोज सुमारे सहा लाख वाहने प्रवेश करतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याचे, स्पष्ट झाले आहे. मुंबईत, देशभरातून लाखो लोक रोजगारासाठी येत असतात. वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण या समस्यांबरोबरच प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे. मुंबईतील जागा आता नव्याने वाढू शकत नाही. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्याय सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करावा आणि त्याची सुरूवात ट्रॉम्बे ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गाने करावी, असे खासदार शेवाळे यांनी केंद्रीय वाहतूक राज्यमंत्र्यांना सांगितले. या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले. याआधीही शेवाळे यांनी या मागणीसाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा केली होती.”

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content