HomeArchiveझाशीच्या राणीचे माहेरघर...

झाशीच्या राणीचे माहेरघर अतिक्रमणाच्या विळख्यात!

Details
झाशीच्या राणीचे माहेरघर अतिक्रमणाच्या विळख्यात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

चंद्रपूरच्या इको-प्रोची महाराष्ट्र परिक्रमा पारोळ्यात
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेर. पुरातत्त्व खात्याने केलेल्या डागडुजीमुळे किल्ला सुस्थितीत असलातरी या भुईकोटला बाहेरच्या बाजूने अतिक्रमणाचा विळखा आहे. येथील एका भव्य बुरूजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. सध्या या तलावाच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. आतील भागात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी इको-प्रोला दिली.

 

ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर परिक्रमा करीत असलेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे भेट दिली. गावाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथून जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट तर रूंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे.

 

या परिसरात त्या काळात पेंढाऱ्यांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख ‘पेंढारपुरा’ म्हणून आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाऱ्या मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात. बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरूजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.

 

किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते. परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. राणीच्या माहेरचे वंशज म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान विदर्भातून मराठवाडामार्गे खान्देशात आलेल्या इको-प्रोच्या टीमने जळगाव भेटीनंतर मंगळवारी सकाळी पारोळा गावाला भेट दिली. अध्यक्ष बंडू धोतरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन किल्ल्याची पाहणी केली. लोकसहभागातून अधिक चांगल्या पध्दतीने स्वच्छता कशी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला सफाईच्या सलग ७०० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली. ध्वनीचित्रफित बघून प्रेरीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखण्यासाठी सहभाग देण्यासाठी होकार दिला.

 ”
 
“चंद्रपूरच्या इको-प्रोची महाराष्ट्र परिक्रमा पारोळ्यात
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेर. पुरातत्त्व खात्याने केलेल्या डागडुजीमुळे किल्ला सुस्थितीत असलातरी या भुईकोटला बाहेरच्या बाजूने अतिक्रमणाचा विळखा आहे. येथील एका भव्य बुरूजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. सध्या या तलावाच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. आतील भागात बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी इको-प्रोला दिली.

 

ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर परिक्रमा करीत असलेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे भेट दिली. गावाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथून जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट तर रूंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे.

 

या परिसरात त्या काळात पेंढाऱ्यांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख ‘पेंढारपुरा’ म्हणून आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाऱ्या मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात. बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरूजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे.

 

किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते. परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. राणीच्या माहेरचे वंशज म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान विदर्भातून मराठवाडामार्गे खान्देशात आलेल्या इको-प्रोच्या टीमने जळगाव भेटीनंतर मंगळवारी सकाळी पारोळा गावाला भेट दिली. अध्यक्ष बंडू धोतरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन किल्ल्याची पाहणी केली. लोकसहभागातून अधिक चांगल्या पध्दतीने स्वच्छता कशी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला सफाईच्या सलग ७०० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली. ध्वनीचित्रफित बघून प्रेरीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखण्यासाठी सहभाग देण्यासाठी होकार दिला.

 ”
 
 
 
 

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content