HomeArchiveजोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा...

जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

Details
जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.
 
 
मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.”
 
 
“मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.”
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content