HomeArchiveजोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा...

जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

Details
जोगेश्वरीच्या मेघवाडीत धारावीसारखा प्रकल्प राबवा – बाळा नर

    12-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.
 
 
मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडीत गेल्या ४ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाला सदर परिस्थिती वारंवार निदर्शनास आणून अजूनही याबाबत कारवाई होत नाही. जर येथे मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन व पालिका घेणार का, शासनाच्या झोपडपट्टी निर्मूलनाचा उद्देश कसा साध्य होणार, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केला आहे.”
 
 
“मौजे मजास येथे न.भू. क्रमांक ८१ ते १३२ या विभागात समाविष्ट भूभागांचे मापन करून येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याची येथील नागरिकांची आग्रही मागणी असून गेली अनेक वर्षे आपण यासाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. मात्र शासन व पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला.”
 
 
सदर भाग हा संपूर्ण आरक्षित व भारग्रस्त असून येथे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची नियमाप्रमाणे कार्यान्वित करणे अशक्य आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सदर योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडीचा भूखंड संपादीत करून येथे धारावीसारखा महत्त्वाकांक्षी पायलट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा अशी आग्रही मागणी एसआरएचे सीईओ दीपक कपूर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील आरक्षित भूखंडाचा विकास होऊन नागरिकांना सार्वजनिक सुविधादेखील मिळतील आणि येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळतील असा विश्वास नर यांनी व्यक्त केला.

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content