HomeArchiveचव्हाणचरणी चोरलेले चित्र?

चव्हाणचरणी चोरलेले चित्र?

Details
चव्हाणचरणी चोरलेले चित्र?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सभ्य, सुसंस्कृत आणि दूरदृष्टी असलेले व्यासंगी राजकारणी होते. त्यांनी 25 वर्षांनंतरचा महाराष्ट्र पाहिला. तो महाराष्ट्र नजरेसमोर ठेवून त्यांनी या राज्याची जडणघडण केली. त्यांचे मानसपुत्र शरद पवार हेदेखील आपल्या गुरूप्रमाणेच सभ्यता आणि सुसंस्कृतपणाच्या बाबतीत विख्यात आहेत. चव्हाणसाहेबांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे ते अध्यक्ष आहेत. मात्र यशवंतरावजींचे हे स्मारक आता एका अप्रिय वादात अडकले आहे. विख्यात चित्रकार पद्मश्री एम. आर. आचरेकर यांच्या एका अमूल्य तैलचित्रावरून हा वाद निर्माण झाला आहे. 30 एप्रिल व 1 मे, 1960 या दरम्यान मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी आचरेकरांनी काढलेले एक तैलचित्र चव्हाण सेंटरमध्ये लावण्यात आले आहे. हे तैलचित्र सेंटरला कोणी दिले हे सेंटरमधील पदाधिकारीदेखील सांगू शकत नाहीत. पण हे अमूल्य तैलचित्र आपल्या मालकीचे असून ते आपल्याला परत मिळावे असा तगादा आचरेकर यांच्या वारसदारांनी लावला आहे.

आचरेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल अनेक वर्षे या तैलचित्रासाठी भांडत होते. 2018 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू नितीन (68) हे आता या तैलचित्रासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 1988 साली विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनासाठी विधिमंडळाने हे तैलचित्र आचरेकर कुटुंबियांकडून काही दिवसांसाठी मागून घेतले. त्यानंतर बरेच प्रयत्न करूनही ते त्यांना परत मिळाले नाही. आता ते यशवंतराव चव्हाण सेंटरची शान बनले आहे.

 

या तैलचित्राच्या मालकीचा वाद तूर्त बाजूला ठेवूया. या संदर्भातील वस्तुस्थितीकडे पाहूया. आचरेकर हे फार मोठे कलाकार होते. ते यशस्वी कला-दिग्दर्शकदेखील होते. सर्वोत्तम कला दिग्दर्शनासाठी त्यांच्या परदेसी, कागज के फूल आणि जिस देश में गंगा बहती है, या चित्रपटांना प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. `आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि सिने आर्ट डायरेक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थांचे अध्यक्ष म्हणून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या त्या ऐतिहासिक सोहळ्यास मध्यरात्री आचरेकर उपस्थित होते. त्यांच्या कुंचल्यातून त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे हे तैलचित्र साकार झाले. अशाप्रकारचे ते एकमेव तैलचित्र असावे. म्हणूनच ते अमूल्य आहे. आता आचरेकर कुटुंबियांनी या तैलचित्रावर मालकी हक्क सांगून एक अप्रिय वाद निर्माण केला आहे. पण वस्तुस्थिती काय आहे हेदेखील पाहयला हवे.

जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडेचे शिष्य मनोहर म्हात्रे यांनी आम्हाला सांगितले की, `आचरेकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सूनबाई अभिनेत्री भारती आचरेकर यांनी त्यांची अनेक मौल्यवान तैलचित्रे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला दिली. 1980 च्या दशकाच्या प्रारंभी नवे विधानभवन निर्माण झाले. त्यावेळी जे.जे.च्या तत्कालीन डीन यांनी आचरेकरांची तैलचित्रे विधानभवनाला दिली. वादात सापडलेले तैलचित्र हे त्यापैकीच एक आहे. आज वाय. एस. गायतोंडे, एम. आर. आचरेकर या थोर कलाकारांच्या तैलचित्रांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकेका तैलचित्राची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. म्हणूनच या तैलचित्रांचा फुकटात ताबा मिळविण्यासाठी आता लोकांची धडपड सुरू असल्याचे दिसते. ज्याअर्थी विधानभवनातील आचरेकरांचे तैलचित्र चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले, त्याअर्थी ते कोणीतरी तेथे नेऊन दिले. तथापि, ते कोणी आणि कधी दिले, याची चव्हाण सेंटरमध्येदेखील नोंद नाही. यावरून हे तैलचित्र म्हणजे `चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला’ असा प्रकार घडला आहे. चव्हाण चरणी चोरलेले चित्र वाहिले गेले आहे (?)

ते काहीही असो. चव्हाण सेंटरने सदर तैलचित्र जतन केल्यामुळेच आज ते टिकून आहे. खेदजनक गोष्ट अशी की, आचरेकर, गायतोंडे यांच्यासारख्या महान कलाकारांची अनेक तैलचित्रे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. त्यांच्या कुटुंबियांची उदासीनतादेखील त्यास कारणीभूत ठरली आहे. आज आचरेकर कुटूंबीय जर त्या अमूल्य तैलचित्रावर दावा सांगत असेल तर तो निखालास खोटा आहे. सदर तैलचित्र जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सने विधिमंडळाला दिले होते. ते चव्हाण सेंटरने जपून ठेवले याबद्दल या संस्थेचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन! या वादावर येथेच पडदा टाकला जावा, हे उत्तम!

फोटो कॅप्शन : 1988 साली विधान भवनात भरलेल्या प्रदर्शनात झळकलेले पद्मश्री एम. आर. आचरेकर यांचे संयुक्त महाराष्ट्र निर्मिती सोहळ्याचे हेच ते ऐतिहासिक तैलचित्र.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सभ्य, सुसंस्कृत आणि दूरदृष्टी असलेले व्यासंगी राजकारणी होते. त्यांनी 25 वर्षांनंतरचा महाराष्ट्र पाहिला. तो महाराष्ट्र नजरेसमोर ठेवून त्यांनी या राज्याची जडणघडण केली. त्यांचे मानसपुत्र शरद पवार हेदेखील आपल्या गुरूप्रमाणेच सभ्यता आणि सुसंस्कृतपणाच्या बाबतीत विख्यात आहेत. चव्हाणसाहेबांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे ते अध्यक्ष आहेत. मात्र यशवंतरावजींचे हे स्मारक आता एका अप्रिय वादात अडकले आहे. विख्यात चित्रकार पद्मश्री एम. आर. आचरेकर यांच्या एका अमूल्य तैलचित्रावरून हा वाद निर्माण झाला आहे. 30 एप्रिल व 1 मे, 1960 या दरम्यान मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी आचरेकरांनी काढलेले एक तैलचित्र चव्हाण सेंटरमध्ये लावण्यात आले आहे. हे तैलचित्र सेंटरला कोणी दिले हे सेंटरमधील पदाधिकारीदेखील सांगू शकत नाहीत. पण हे अमूल्य तैलचित्र आपल्या मालकीचे असून ते आपल्याला परत मिळावे असा तगादा आचरेकर यांच्या वारसदारांनी लावला आहे.

आचरेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल अनेक वर्षे या तैलचित्रासाठी भांडत होते. 2018 साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू नितीन (68) हे आता या तैलचित्रासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 1988 साली विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनासाठी विधिमंडळाने हे तैलचित्र आचरेकर कुटुंबियांकडून काही दिवसांसाठी मागून घेतले. त्यानंतर बरेच प्रयत्न करूनही ते त्यांना परत मिळाले नाही. आता ते यशवंतराव चव्हाण सेंटरची शान बनले आहे.

 

या तैलचित्राच्या मालकीचा वाद तूर्त बाजूला ठेवूया. या संदर्भातील वस्तुस्थितीकडे पाहूया. आचरेकर हे फार मोठे कलाकार होते. ते यशस्वी कला-दिग्दर्शकदेखील होते. सर्वोत्तम कला दिग्दर्शनासाठी त्यांच्या परदेसी, कागज के फूल आणि जिस देश में गंगा बहती है, या चित्रपटांना प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. `आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि सिने आर्ट डायरेक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थांचे अध्यक्ष म्हणून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या त्या ऐतिहासिक सोहळ्यास मध्यरात्री आचरेकर उपस्थित होते. त्यांच्या कुंचल्यातून त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे हे तैलचित्र साकार झाले. अशाप्रकारचे ते एकमेव तैलचित्र असावे. म्हणूनच ते अमूल्य आहे. आता आचरेकर कुटुंबियांनी या तैलचित्रावर मालकी हक्क सांगून एक अप्रिय वाद निर्माण केला आहे. पण वस्तुस्थिती काय आहे हेदेखील पाहयला हवे.

जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडेचे शिष्य मनोहर म्हात्रे यांनी आम्हाला सांगितले की, `आचरेकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सूनबाई अभिनेत्री भारती आचरेकर यांनी त्यांची अनेक मौल्यवान तैलचित्रे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला दिली. 1980 च्या दशकाच्या प्रारंभी नवे विधानभवन निर्माण झाले. त्यावेळी जे.जे.च्या तत्कालीन डीन यांनी आचरेकरांची तैलचित्रे विधानभवनाला दिली. वादात सापडलेले तैलचित्र हे त्यापैकीच एक आहे. आज वाय. एस. गायतोंडे, एम. आर. आचरेकर या थोर कलाकारांच्या तैलचित्रांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एकेका तैलचित्राची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. म्हणूनच या तैलचित्रांचा फुकटात ताबा मिळविण्यासाठी आता लोकांची धडपड सुरू असल्याचे दिसते. ज्याअर्थी विधानभवनातील आचरेकरांचे तैलचित्र चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले, त्याअर्थी ते कोणीतरी तेथे नेऊन दिले. तथापि, ते कोणी आणि कधी दिले, याची चव्हाण सेंटरमध्येदेखील नोंद नाही. यावरून हे तैलचित्र म्हणजे `चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला’ असा प्रकार घडला आहे. चव्हाण चरणी चोरलेले चित्र वाहिले गेले आहे (?)

ते काहीही असो. चव्हाण सेंटरने सदर तैलचित्र जतन केल्यामुळेच आज ते टिकून आहे. खेदजनक गोष्ट अशी की, आचरेकर, गायतोंडे यांच्यासारख्या महान कलाकारांची अनेक तैलचित्रे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. त्यांच्या कुटुंबियांची उदासीनतादेखील त्यास कारणीभूत ठरली आहे. आज आचरेकर कुटूंबीय जर त्या अमूल्य तैलचित्रावर दावा सांगत असेल तर तो निखालास खोटा आहे. सदर तैलचित्र जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सने विधिमंडळाला दिले होते. ते चव्हाण सेंटरने जपून ठेवले याबद्दल या संस्थेचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन! या वादावर येथेच पडदा टाकला जावा, हे उत्तम!

फोटो कॅप्शन : 1988 साली विधान भवनात भरलेल्या प्रदर्शनात झळकलेले पद्मश्री एम. आर. आचरेकर यांचे संयुक्त महाराष्ट्र निर्मिती सोहळ्याचे हेच ते ऐतिहासिक तैलचित्र.”
 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content