HomeArchive‘एमएसएमई’च्या सुधारीत मर्यादा...

‘एमएसएमई’च्या सुधारीत मर्यादा लागू करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर पॅकेज’ घोषित करताना एमएसएमई क्षेत्राच्या वाढवलेल्या मर्यादा लागू करण्याचे दिलेले आदेश लागू करावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँका, आर्थिक संस्था तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना दिल्याची माहिती ‘फिक्की’चे संचालक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
 
केंद्र सरकारने आत्मनिर्भर पॅकेज घोषित करताना सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकत्रित करून पात्रता निकष सुधारीत करताना एक कोटींची गुंतवणूक व 5 कोटी रूपयांची उलाढाल असणार्यास उद्योगांना सूक्ष्म श्रेणी, दहा कोटी रूपये गुंतवणूक व उलाढाल 50 कोटी रूपये असणार्याय उद्योगांना लघु उद्योग श्रेणी, तर 50 कोटी गुंतवणूक व 250 कोटी उलाढाल असणार्याय उद्योगांना मध्यम उद्योग श्रेणी देण्यात आली आहे. या नवीन श्रेणीप्रमाणे उद्योगांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 
 
हे वर्गीकरण करताना सेवा व वस्तूंच्या निर्यातीतून होणारी उलाढाल वगळून, उलाढाल निश्चिगत करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने 02 जुलै 2020च्या त्यांच्या आदेश क्रमांक RBI /2020-2021/10 अन्वये दिल्या असून या आदेशाची अंमलबजावणी 1 जुलै 2020पासून सुरू करण्यात आली आहे.
 
आत्मनिर्भर पॅकेजेच्या घोषणेप्रमाणे नवीन निकाषांमध्ये सूक्ष्म, लघु, व मध्यम श्रेणीमध्ये नव्याने समावेश झालेल्या उद्योगांना या पॅकेजचा लाभ अद्यापही मिळत नव्हता. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे या सर्व घटकांना पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाल्याने व्यापारी व उद्योजक या दोन्ही घटकांची वाढीव भांडवलाची गरज पूर्ण होण्यात येणार्याँ अडचणी निश्चिदतपणे दूर होतील असा विश्वाभसही गांधी यांनी व्यक्त केला.
 “

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content