HomeArchiveईशान्य मुंबईत भाजपच्या...

ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर

Details
ईशान्य मुंबईत भाजपच्या कोटक यांचा हायटेक प्रचारावर भर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.

 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एकीकडे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघातील पदयात्रा आणि चौकसभांद्वारे जनसंवादावर भर देत परंपरागत प्रचारपद्धतीचा अवलंब केला असतानाच सोशल मीडियासारख्या नव्या तंत्राचा वापरही प्रचारात प्रभावीपणे केला जात आहे. विशेष करून युवा आणि उच्चशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हायटेक प्रचारावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणचे बुथ वर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठीही फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंगसाईट्सचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्या मतदारांशी थेट संवादावर प्रचाराचा भर असून चौकसभा आणि पदयात्रांचे योग्य आयोजन करण्यात येत आहे. मात्र सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग असून फेसबुक, वॉट्सअप आणि ट्वीटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सही संवादाचे प्रमुख माध्यम बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुक प्रचारातही त्यांचा प्रभावी वापर केला जात आहे. विशेषत: तरूण आणि उच्चशिक्षित वर्गाद्वारे या सोशल नेटवर्किंग साईट्सचा सढळ हस्ते वापर होत असल्याने त्या माध्यमातूनही प्रचार करण्याचे नियोजन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेत सोशल मीडियाचा वापर करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याशिवाय महायुतीचे कार्यकर्ते, बुथवर्कर्स, कॅम्पेन मॅनेजर्स यांच्याशी समन्वय राखण्याच्या कामीही सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. एकूणच काय तर कमी वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची सगळी यंत्रणा महायुतीने ईशान्य मुंबईत कामाला लावल्याचे चित्र आहे.

 
 
 
 ”
 
 
 
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content