HomeArchiveआयआयटी मुंबईने सुरू...

आयआयटी मुंबईने सुरू केले स्व-मदत संकेतस्थळ

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी काल सकाळी आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू-स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले.”
 
“चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि काळजी घेतली जाते. सुरक्षित आणि उत्साही शैक्षणिक वातावरण, विस्तृत शैक्षणिक पध्दतीचा अनुभव, उत्तम भौतिक पायाभूत सुविधा, उचित संसाधनांचा वापर येथे शैक्षणिक अनुकूलतेसाठी केला जातो. विद्यार्थी हे शैक्षणिक व्यवस्थेचे प्रमुख भागीदार आहेत. उत्साही महाविद्यालयीन जीवन उच्च दर्जाच्या शिकण्या-शिकविण्यासाठी आवश्यक असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळ, संस्कृती/कला क्लब, पर्यावरण क्लब, कार्यकारी क्लब, सामाजिक सेवा प्रकल्प अशा प्रकारच्या विविध ठिकाणच्या भरपूर संधी देण्यात याव्यात, असे ते म्हणाले.”
 

 
“‘बंधू’ची रचना आयआयटीतील समुपदेशक आणि बाह्य तज्ज्ञ यांनी संयुक्तपणे तयार केली असून त्यात त्यांना डीन प्रा. टी कडू (विद्यार्थी कल्याण) आणि प्रा.सुहास जोशी (माजी विद्यार्थी आणि सामूहिक संबंध) यांनी सहाय्य केले आहे. शैक्षणिक जीवनात येणाऱ्या कॉलेज जीवनातील ताणापासून, अभ्यासाचा तणाव आणि मानसिक आरोग्य यासारख्या सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सहाय्य करेल. बंधूमधे विविध वाचनीय लेख, माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास, तज्ज्ञांचे पॉडकास्ट्स आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी आवश्यक साधने यांचा समावेश आहे.”
 
“बंधूची संकल्पना 1992 सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या 2017 साली झालेल्या रौप्य महोत्सवी पुनर्मिलनाच्या वेळी मांडली गेली. त्यांनी आयआयटी मुंबईला मदत करण्याची प्रतिज्ञा केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनिक समृद्धीत वृद्धी करण्याचे ठरविले. स्व-मदत संकेतस्थळ हे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ते या प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करत आहे. आपण अशा काळात आहोत, जिथे तणावामुळे त्रस्त व्हायला होते. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यावेळी म्हणाले.”

 
“अनेक गोष्टी सुरूवातीच्या टप्प्यात प्रभावीपणे हाताळता आल्या तर विद्यार्थ्यांना सहाय्य करून विद्यार्थ्यांना ही आव्हाने पेलणे शक्य होऊन, एकामागोमाग एक येणारी संकटे (डॉमिनो ईफेक्ट) टाळता येतात. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईतील आधार व्यवस्थेची मदत घ्यायची वेळ कोणती हेही यामुळे लक्षात येईल, असे आयआयटीच्या 1992च्या तुकडीतील माजी विद्यार्थिनी रेखा कोयता यावेळी म्हणाल्या. प्रख्यात सिनेनिर्माता आणि आयआयटीचे माजी विद्यार्थी नीतेश तिवारी हेदेखील या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.”

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content