HomeArchiveअरविंद सावंत यांच्या...

अरविंद सावंत यांच्या रूपाने मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व – लोढा

Details
अरविंद सावंत यांच्या रूपाने मुंबईला मिळाले सशक्त प्रतिनिधित्व – लोढा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळासाठी निवड केल्यामुळे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दक्षिण मुंबईच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. लोढा यांनी विश्वास व्यक्त केला की, मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा ठरणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. आमदार लोढा म्हणाले, की सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळासाठी निवड केल्यामुळे मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. या आनंदाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष लोढा म्हणाले की, सावंत यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याने दक्षिण मुंबईला आणखी एक सशक्त प्रतिनिधित्व लाभले आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सावंत यांना दक्षिण मुंबईतील समस्यांबाबत माहिती आहे. त्यामुळे आता येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्राकडून अधिक सहकार्य मिळेल.

नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात आमदार मंगल प्रभात लोढा हेदेखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर सावंत यांच्या घरी भेटून त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दक्षिण मुंबईच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. लोढा यांनी विश्वास व्यक्त केला की, मंत्री झाल्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीत सावंत यांचा महत्त्वाचा वाटा असेल व समस्या निराकरणाचे काम लवकर सुरू होईल व तितक्याच लवकर पूर्ण होईल. खासदार अरविंद सावंत मंत्री झाल्याने विकासासाठी अडथळा ठरणारे अनेक प्रस्ताव मार्गी लागतील.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल भागातील सावंत यांना सुमारे ६० हजारांनी मताधिक्य मिळाले आहे. त्यांच्या विजयासाठी मलबार हिल येथील मतदानाचा टक्का महत्त्वपूर्ण ठऱला आहे. आमदार लोढा म्हणाले, की सावंत एक लढाऊ नेता आहेत व ते जनतेच्या समस्या समजून घेतात. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”

Continue reading

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...
Skip to content