HomeArchiveअण्णाभाऊ साठे यांना...

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे

Details
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.

 

35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.

 

35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
 

Continue reading

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...

साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-साईनगर शिर्डी रेल्वे उद्यापासून!!

पुणे-साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वेसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्या दुपारी साडेतीन वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून पुणे-साईनगर शिर्डी डेली एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. पुणे आणि साईनगर, शिर्डीदरम्यानची ही पहिलीच थेट रेल्वेसेवा असेल, ज्यामुळे...
Skip to content