HomeArchiveअण्णाभाऊ साठे यांना...

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे

Details
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या – खा. राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.

 

35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
कष्टकरी, शोषित आणि दलित वर्गाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडणारे आणि शोषितांचे आत्मभान जागृत करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. एका पत्रकाद्वारे केलेल्या या मागणीत शेवाळे यांनी आण्णाभाऊंचे कार्य हे देशभरातील शोषितांसाठी प्रेरणादायी असल्याचा उल्लेख केला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला नुकतीच मुख्यमंत्र्यानी मंजुरी दिली आहे. घटकोपराच्या चिराग नगर येथे उभारल्या जाणाऱ्या या स्मारकाच्या निर्णयाबाबत खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून केंद्र सरकारने अण्णाभाऊंसारख्या थोर समाजसुधारकाची दखल घ्यावी, अशी आशा व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून शेवाळे यांनी लावून धरली आहे.

 

35 हून अधिक कादंबऱ्या, अनेक पटकथा, पोवाडे आणि इतर अनेक साहित्यकृतीतून शोषित आणि दलितांचे आत्मभान जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भारतातील बहुतांश भाषांमध्ये याआधीच भाषांतरित झालेले आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ राज्यापुरते मर्यादित नसून साऱ्या देशाला प्रेरणा देणारे आहेत, म्हणूनच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सरकारने त्यांना अभिवादन करावे, अशी माझी मागणी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.”
 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content