Homeटॉप स्टोरीजम्मू-काश्मीरमध्ये होणार का...

जम्मू-काश्मीरमध्ये होणार का विधानसभेच्या निवडणुका?

राज्यात निवडणुकीची शक्यता पडताळून पाहणार

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये पाहणी करून तेथील कायदा व सुव्यवस्था निरिक्षण करणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे एक पथक 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करेल तसेच निवडणुका घेण्याच्या शक्यता पडताळून पाहतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार स्वतः आयोगाच्या टीमचे नेतृत्त्व करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत इतर 2 निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार आणि एस एस संधूदेखील उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाची टीम प्रथम श्रीनगरमध्ये राजकीय पक्षांची भेट घेणार आहे. याशिवाय ही टीम केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहे.

याशिवाय निवडणूक आयोगाची टीम मुख्य सचिव, डीजीपी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांचीही भेट घेणार आहे. यानंतर 10 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाची टीम जम्मूला भेट देईल आणि विविध सुरक्षायंत्रणांना भेटेल. यानंतर निवडणूक आयुक्त जम्मूमध्येच पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि निवडणुकीच्या तयारीबाबत प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देतील.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content