Homeटॉप स्टोरीजम्मू-काश्मीरमध्ये होणार का...

जम्मू-काश्मीरमध्ये होणार का विधानसभेच्या निवडणुका?

राज्यात निवडणुकीची शक्यता पडताळून पाहणार

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये पाहणी करून तेथील कायदा व सुव्यवस्था निरिक्षण करणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे एक पथक 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करेल तसेच निवडणुका घेण्याच्या शक्यता पडताळून पाहतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार स्वतः आयोगाच्या टीमचे नेतृत्त्व करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत इतर 2 निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार आणि एस एस संधूदेखील उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाची टीम प्रथम श्रीनगरमध्ये राजकीय पक्षांची भेट घेणार आहे. याशिवाय ही टीम केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहे.

याशिवाय निवडणूक आयोगाची टीम मुख्य सचिव, डीजीपी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांचीही भेट घेणार आहे. यानंतर 10 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाची टीम जम्मूला भेट देईल आणि विविध सुरक्षायंत्रणांना भेटेल. यानंतर निवडणूक आयुक्त जम्मूमध्येच पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि निवडणुकीच्या तयारीबाबत प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देतील.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content