Homeटॉप स्टोरीजम्मू-काश्मीरमध्ये होणार का...

जम्मू-काश्मीरमध्ये होणार का विधानसभेच्या निवडणुका?

राज्यात निवडणुकीची शक्यता पडताळून पाहणार

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये पाहणी करून तेथील कायदा व सुव्यवस्था निरिक्षण करणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे एक पथक 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान या केंद्रशासित प्रदेशाचा दौरा करेल तसेच निवडणुका घेण्याच्या शक्यता पडताळून पाहतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार स्वतः आयोगाच्या टीमचे नेतृत्त्व करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यासोबत इतर 2 निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार आणि एस एस संधूदेखील उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाची टीम प्रथम श्रीनगरमध्ये राजकीय पक्षांची भेट घेणार आहे. याशिवाय ही टीम केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांनाही भेटणार आहे.

याशिवाय निवडणूक आयोगाची टीम मुख्य सचिव, डीजीपी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांचीही भेट घेणार आहे. यानंतर 10 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाची टीम जम्मूला भेट देईल आणि विविध सुरक्षायंत्रणांना भेटेल. यानंतर निवडणूक आयुक्त जम्मूमध्येच पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि निवडणुकीच्या तयारीबाबत प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देतील.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content