Homeहेल्थ इज वेल्थमुंबई गोवर उद्रेक...

मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेल संपूर्ण भारतामध्ये राबवणार?

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने नियमित लसीकरण बळकटीकरणासाठी तसेच गोवर रूबेला दूरीकरण करण्याचे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. यादृष्टीने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे दिल्ली तसेच महाराष्ट्र स्तरावरील विशेषज्ञ डॉक्टर यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेल संपूर्ण भारतामध्ये राबविण्याविषयीचे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. वर्ष २०२४-२०२५मध्ये गोवर रूबेला लसीकरण ९५% पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेत ठेवण्यात आले आहे. 

प्रत्येक वर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेमार्फत जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा २०२४ या वर्षाचे आरोग्य दिनाचे घोषवाक्य ‘माझं आरोग्य, माझं अधिकार’ हे आहे. ‘माझं आरोग्य, माझं अधिकार’ या घोषवाक्यानुसार  प्रौढांच्या आरोग्याप्रमाणे लहान बाळांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.

या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक तसेच भारतीय स्तरावरील नियमित लसीकरण आणि गोवर रूबेला उद्रेकाविषयी आकडेवारी सादर करून त्यावर चर्चा केली. तसेच २०२२-२३मध्ये मुंबई गोवर उद्रेक नियंत्रण मॉडेलचे कौतुकदेखील डॉक्टरांनी केले. कार्यशाळेमध्ये सहा विविध विषयांवर विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये  लसीकरणास नकार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सामाजिक संवाद कौशल्य, सूक्ष्मकृती आराखडा, लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या कार्यक्षेत्रात लसीकरण वाढवण्याबाबतची कृती, जोखीमग्रस्त भागात लसीकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा गट बनवणे, या विषयांचा समावेश होता.

या कार्यशाळेमध्ये नियमित लसीकरणाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वर्ष २०२४-२०२५ वर्षांमध्ये गोवर रूबेला लसीकरण ९५% पूर्ण करण्याच्या दिशेने करावयाच्या कार्यवाहीबाबत जागतिक आरोग्य संघटना तसेच महानगरपालिकेतील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे सर्व आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन एका नवीन दिशेकडे पाऊल टाकण्यात येईल, असा विश्वास सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content