Homeहेल्थ इज वेल्थहत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य...

हत्तीरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य भारत 3 वर्षांआधीच गाठणार?

मिशन मोड, बहु भागीदार, बहु क्षेत्र लक्ष्यित मोहिमेद्वारे जागतिक लक्ष्यापेक्षा तीन वर्षे आधी म्हणजेच 2027पर्यंत हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.

डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वार्षिक राष्ट्रव्यापी व्यापक औषध सेवन (एमडीए) उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. सिंह बघेल हेदेखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, जन भागीदारी, ‘सरकारचा संपूर्ण सहभाग’ आणि ‘संपूर्ण समाजाचा सक्रिय सहभाग’ या दृष्टिकोनाद्वारे आपण हा आजार देशातून नष्ट करू शकू, असा विश्वास डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. 10 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणारा या उपक्रमाचा दुसरा टप्पा या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या 9 राज्यांमधील (आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश) 81 जिल्ह्यात राबवला जाणार आहे.

हा आजार आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केवळ औषधे घेण्यापुरते मर्यादित नसावेत, तर डासांच्या माध्यमातून याचा प्रसार रोखण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत, यावर डॉ. मांडविया यांनी यावर भर दिला. त्याशिवाय आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गावरील प्रगती खुपच मर्यादित राहील. असेही ते म्हणाले.

आरोग्य संपन्न  राष्ट्र सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वय वाढवण्यावरही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर दिला.

याप्रसंगी डॉ. मांडविया यांनी डेंग्यू ताप 2023 आणि चिकुनगुनिया तापाच्या चिकित्सा  व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content