Tuesday, March 11, 2025
Homeकल्चर +विद्रोही साहित्य संमेलनाला...

विद्रोही साहित्य संमेलनाला ग्रेटा थनबर्ग?

महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये यंदा ९४वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २५ ते २८ मार्चदरम्यान होणार असून याचदरम्यान नाशिकमध्येच १५वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून आयोजित या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शेतकरी आंदोलनाला ट्विटरवरून पाठिंबा देणाऱ्या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.

मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांची पत्रकार परिषद झाली. त्यात विद्रोहीच्या अध्यक्षा प्रा. प्रतीमा परदेशी यांनी १५व्या संमेलनाची घोषणा केली. २५ आणि २६ मार्चला नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएमएच महाविद्यालयाच्या आवारात संमेलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समीक्षक डॉ. आनंद पाटील (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. पाटील आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार व इतिहासकार आहेत. निर्भीड मांडणी आणि आंतरविद्याशाखीय व्यासंगासाठी ते ओळखले जातात. कागूद आणि सावली, या त्यांच्या दोन लघु कांदबऱ्या गाजल्या आहेत. गोवा, नवी दिल्ली आणि उत्तर गुजरात विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यांची २४पेक्षा अधिक ग्रंथसंपदा प्रकाशित झाल्याचे विद्रोहीचे राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले यांनी सांगितले.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्य सरकार देत असलेले ५० लाख रूपयांचे अनुदान रद्द करावे, अशी मागणी विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे यांनी यावेळी केली. मूठभर धान्य आणि एक रुपया अशी वर्गणी घेऊन हे संमेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचे सर्व नियम पाळून संमेलन घेणार असल्याचे विद्रोहीचे विश्वस्त गणेशभाई उन्हवणे म्हणाले. दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन आणि केंद्रातल्या मोदी सरकारकडून होत असलेली अभिव्यक्तीची गळचेपी, या पार्श्वभूमीवर नाशिक येथे हे १५वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे, असे राजू देसले म्हणाले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content