Monday, October 28, 2024
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या मुलींना पदव्युत्तरपर्यंत...

महाराष्ट्रातल्या मुलींना पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण?

महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना पदव्यत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कधीही याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नुकतेच शासनाचे धोरण जाहीर केले आहे. त्यात याचा समावेश आहे.

शिक्षण

या प्रस्तावित निर्णयाची माहिती मिळताच राज्यसभेच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने विधान भवनात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणामध्ये मोलाची भर पडणार आहे, असे त्या म्हणाल्या.

आज विधानभवनात यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांचे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रताप चिखलीकर,आमदार भरत गोगावले, प्रसाद लाड, विप्लव बजोरिया, माजी आमदार अमर राजुरकर, राम रातोळीकर, संजय शिरसाट, बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह आदी हजर होते.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content