Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या मुलींना पदव्युत्तरपर्यंत...

महाराष्ट्रातल्या मुलींना पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण?

महाराष्ट्रातल्या सर्व मुलींना पदव्यत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कधीही याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत नुकतेच शासनाचे धोरण जाहीर केले आहे. त्यात याचा समावेश आहे.

शिक्षण

या प्रस्तावित निर्णयाची माहिती मिळताच राज्यसभेच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने विधान भवनात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणामध्ये मोलाची भर पडणार आहे, असे त्या म्हणाल्या.

आज विधानभवनात यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. या ऐतिहासिक निर्णयासाठी त्यांचे तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रताप चिखलीकर,आमदार भरत गोगावले, प्रसाद लाड, विप्लव बजोरिया, माजी आमदार अमर राजुरकर, राम रातोळीकर, संजय शिरसाट, बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह आदी हजर होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content