Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा...

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा देवपिता आहे तरी कोण?

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ ‘आंदण’ दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे व्यापारी बंधू (?) जनतेच्या हक्काचे असलेले पदपथही मोकळे सोडायला तयार होत नाहीत. देशात वा राज्यात कुठेही रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग असतानाही गेले तीन दिवस काही कारणाने राममारुती रोडवर कामानिमित्त येणेजाणे झाले तेव्हा पदपथ गायबच असलेले दिसले. शिवाय कुणीतरी बड्या आसामीने आपल्या पित्याच्या आठवणीसाठी बांधलेल्या इमारतीने तर पदपथ गिळंकृत केलेला दिसला. तेथेच त्यांनी आपल्या गाडीसाठी उतरण्ड तयार केलेले दिसले.

त्याच्यापुढे तर एका दुकानदाराने आपल्या दुकानाची पायरीच पदपथावर आणली आहे. याचा अर्थच या व्यापारी मंडळीचा ‘देवपिता’ कुणी सॉलिड माणूस असणार हे उघडच आहे. कारण महापालिका प्रशासन वा पोलीस / वाहतूक प्रशासनाला न जुमानण्याची हिंमत ‘देवपित्या’शिवाय होणारच नाही.. म्हणजे आता येत्या नववर्षापर्यन्त गोखले रोड, राममारुती रोडवरील वाहतूककोंडीबाबत बोलायलाच नको. आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष दयावे, असे वाटायला लागले आहे.

Continue reading

योगेश दादूस.. दातांवर उपाय करायचाय!

प्रिय राज्यमंत्री योगेश दादूस, पेशंट लाडकी बहीण यशवंतीचा सप्रेम नमस्कार... दादूस, तुला त्रास देत आहे, माफी असावी. खरंतर मला मुंबईला जायचे होते. पण काल चिपळूणहून निघून खेडमार्गे मुंबईला जाण्याचे ठरवले. कारण माझ्या दातांचा भयंकर त्रास होऊ लागल्याने फारच अस्वस्थ झाली होते....

महायुती असो वा मविआ, चिपळूण मात्र विकासापासून दूरच

सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त चिपळूण, गुहागर व दाभोळ परिसरात जाण्याचा योग आला. जी स्थिती राज्यातील महापालिकांची आहे त्यापेक्षा कितीतरीपट...

४२ पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कशाला हवाय सन्मान?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवाभाऊंनी एका सरकारी निर्णयाद्वारे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागण्याचा आदेश जारी केल्याचे सर्व वर्तमानपत्रे आणि माध्यमांनी जाहीर केले होते. अद्यापी याबाबत सरकारने काहीही खुलासा न केल्याने तो निर्णय खराच असल्याचे मानून दोन शब्द लिहिण्याचे धाडस करत आहे....
Skip to content