Homeचिट चॅट.. आणि जेव्हा...

.. आणि जेव्हा टँकरच विमानात सामावतो!

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढ्यात, कोविड रुग्णालये आणि सुविधा केंद्र स्थापन उभारण्यासाठी तसेच कार्यरत असलेली रुग्णालये आणि केंद्रांना पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन कंटेनर (टँकर), सिलेंडर, अत्यावश्यक औषधे, उपकरणे आदींचा पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दल अतिशय तत्परतेने कार्यरत झाले आहे.

देशाच्या विविध भागातून हवाई मार्गाने ही सामग्री घेऊन निर्धारित ठिकाणी पोहोचवण्यासाठी हवाई दलाची विमाने उड्डाणे करत आहेत. यासाठी हवाई दलाच्या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सी-17, सी-130 जे, आयएल-76, एन -32 आणि ऍवरो या मालवाहतूक करणाऱ्या विमानांचा त्यात समावेश आहे.

या कामासाठी चिनूक आणि एमआय-17 ही हेलिकॉप्टर राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कोची, मुंबई, वायझॅग आणि बेंगळुरू येथील डॉक्टर आणि परिचारिकांना दिल्लीतील रुग्णालयात सेवेत दाखल होण्यासाठी हवाई मार्गे दिल्लीला पोहोचविण्याच्या कामाचाही समावेश आहे.

अतिशय गरजेच्या असलेल्या ऑक्सिजनचे वितरण वेगाने व्हावे यासाठी, भारतीय हवाई दलाच्या सी-17 आणि आयएल-76 या विमानांमधून मोठे रिकामे ऑक्सिजन टँकर त्यांच्या वापराच्या ठिकाणाहून देशभरातील ऑक्सिजन भरणा केंद्रांवर नेण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त, लेह येथे अतिरिक्त कोविड चाचणी केंद्र उभारण्यासाठी सी-17 आणि आयएल-76 या विमानांनी बायोसॅफ्टी कॅबिनेट्स आणि ऑटोक्लेव्ह यंत्रांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली आहे.

अतिशय तातडीने उड्डाण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची मालवाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. 2020मध्ये कोविड-19च्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात, भारतीय हवाई दलाने कोरोना विषाणू साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी हवाईमार्गे आवश्यक औषधे, वैद्यकीय आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला तसेच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content