Homeपब्लिक फिगरथकलेले कोट्यवधींचे भाडे...

थकलेले कोट्यवधींचे भाडे मिळणार तरी कधी?

मुंबईतल्या वांद्रे पूर्व परिसरातील गोळीबार एसआरए योजनेतील प्रकल्पग्रस्त गरीबांना त्यांचे थकलेले कोट्यवधी रूपयांचे भाडे कधी मिळणार, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे सदस्य नितेश राणे यांनी आज विधानसभेत केला.

झिशान सिद्दीकी यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उपप्रश्न विचारताना नितेश राणे म्हणाले की, कोट्यवधी रूपयांचे भाडे थकवण्याइतकी वाईट परिस्थिती सदर विकासकाची नाही. हा लहान बिल्डर नाही. सध्याची मार्केटची स्थिती त्याला लागू पडत नाही. त्याचे अन्य प्रोजेक्ट चालू आहेत. प्रकल्पग्रस्तांचे भाडे थकवणे ही या बिल्डरची मस्ती आहे. त्यामुळे तातडीने त्यावर कारवाई करून त्याला भाडे देण्यास भाग पाडावे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याला उत्तर दिले. याबाबत आपण लवकरात लवकर विकासक, म्हाडा तसेच एसआरएचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक बोलावू आणि प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर थकलेले भाडे देण्यास भाग पाडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याआधी झिशान सिद्दीकी यांनी कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी विकासक बदलण्याची तसेच प्रकल्पग्रस्त भाडेकरूंचे थकलेले सुमारे १२ कोटी भाडे देण्यास विकासकाला भाग पाडण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना आव्हाड यांनी सांगितले की, ३-के नियमाखाली सुरू झालेल्या काही सुरूवातीच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. तो रद्द करणे योग्य होणार नाही. निश्चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांचे थकलेले भाडे मिळण्यासाठी आपण एक संयुक्त बैठक बोलावू.

एसआरए व म्हाडाची गंगाजळी रिकामी

आशिष शेलार यांनी हा प्रकल्प एसआरएने पूर्ण करावा. तसेच इतरत्रही रखडलेल्या प्रकल्पांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, नवे प्रकल्प राबविण्याची ताकद एसआरएकडे नाही. म्हाडाही, याला दे, त्याला दे करत रिकामी झाली आहे. अशा स्थितीत एक नवा प्रयोग करण्याचा आमचा विचार आहे. अशा योजना म्हाडा आणि एसआरए एकत्रितपणे राबवतील. प्रकल्पग्रस्तांसाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम म्हाडा आणि एसआरए करेल आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या जागेचा लीलाव केला जाईल. वांद्रे ते कुलाब्याच्या बधवार पार्कपर्यंत अशाप्रकारे योजना राबविल्या जातील. त्यामुळे म्हाडा आणि एसआरएकडे भरपूर पैसा येईल.

योगेश सागर यांनी, असा प्रयोग करताना आपले मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. सावध राहवे, असा सल्ला दिला आणि एकच हंशा पिकला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content