Homeमाय व्हॉईससातव्या आर्थिक जनगणनेपासून...

सातव्या आर्थिक जनगणनेपासून प. बंगालचा ‘किनारा’!

सातव्या आर्थिक जनगणनेसाठी प्रत्यक्ष जमिनीवरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सातव्या, आर्थिक सर्वेक्षणाच्या संदर्भात, 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक निकषांना मान्यता दिलेली नाही तर दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत मान्यतेसाठीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, सातव्या आर्थिक जनगणनेच्या देशव्यापी निकालाला अंतिम स्वरूप देता आले नाही. सातव्या आर्थिक जनगणनेत सहभागी न झालेले पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

बंगाल

मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये विविध स्तरांवर अनेक सल्लामसलत आणि संवाद झाले असले तरी ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

कृषी, वनीकरण, मासेमारी, खाणकाम आणि उत्खनन क्षेत्राची आकडेवारी पश्चिम बंगाल सरकारकडून प्राप्त केली जात आहे आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजासाठी उत्पादन आणि सकल मूल्यांच्या संकलनासाठी वापरली जाते.

सातव्या आर्थिक जनगणनेत सहभागी झालेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

  1. अंदमान आणि निकोबार बेटे
  2. आंध्र प्रदेश
  3. अरुणाचल प्रदेश
  4. आसाम
  5. बिहार
  6. चंदीगड
  7. छत्तीसगड
  8. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
  9. दिल्ली
  10. गोवा
  11. गुजरात
  12. हरियाणा
  13. हिमाचल प्रदेश
  14. जम्मू आणि काश्मीर
  15. झारखंड
  16. कर्नाटक
  17. केरळ
  18. लडाख
  19. लक्षद्वीप
  20. मध्य प्रदेश
  21. महाराष्ट्र
  22. मणिपूर
  23. मेघालय
  24. मिझोराम
  25. नागालँड
  26. ओडिशा
  27. पुडुचेरी
  28. पंजाब
  29. राजस्थान
  30. सिक्किम
  31. तामिळनाडू
  32. तेलंगणा
  33. त्रिपुरा
  34. उत्तर प्रदेश
  35. उत्तराखंड

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content