Homeमुंबई स्पेशलमुंबईकरांची पाण्याची चिंता...

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटल्यात जमा!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता बऱ्याच प्रमाणात मिटली आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात सोमवार, २९ जुलैपासून मागे घेण्यात येत असल्याचे पालिकेने जाहीर केले असून ठाणे शहर, भिवंडी व नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतीना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपातदेखील मागे घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयात जुलैमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्‍याने पाणीसाठ्यामध्ये सातत्‍याने वाढ होत आहे. १ जुलै ते २५ जुलै या कालावधीत पाणीसाठ्यात सुमारे ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हीच परिस्थिती जुलै महिन्‍याच्‍या अखेरच्‍या आठवड्यात तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात सध्‍या लागू असलेली १० टक्के पाणीकपात मागे घेण्‍यात येत आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्‍या प्रारंभापर्यंत मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पाणीसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ३० मेपासून ५ टक्‍के तर ५ जूनपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातदेखील कपात लागू करण्‍यात आली होती.

मुंबई

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला वार्षिक पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. 

सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी होत असून पाणीसाठा ६६.७७ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण भरून वाहू लागले आहेत. या ७ तलावांपैकी विहार व मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव हा आज पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी तर मोडक सागर तलाव आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. गेल्याच आठवड्यात २० जुलैला तुळशी तर काल तानसा तलावदेखील ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आज एकाच दिवशी आणखी दोन तलाव पूर्ण भरून, ओसंडून वाहू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) आहे. हा तलाव गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये २६ जुलै रोजी मध्यरात्री १२.४८ वाजता, सन २०२२मध्ये ११ ऑगस्टला आणि सन २०२१मध्ये १८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. मोडक सागर तलाव गेल्या वर्षी २०२३मध्ये २७ जुलै रोजी, सन २०२२मध्ये १३ जुलै रोजी आणि २०२१मध्ये २२ जुलैला वाहू लागला होता. मोडक सागर तलावाची एकूण जलधारण क्षमता १२८९२.५ कोटी लीटर (१२८,९२५ दशलक्ष लीटर) आहे.

मुंबई

तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१मध्ये दिनांक २२ जुलैला पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवणक्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ९६६३९.५ कोटी लीटर (९६६,३९५ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६६.७७ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटल्यात जमा आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content