Homeकल्चर +वॉर 2मध्ये दिसणार...

वॉर 2मध्ये दिसणार हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातली टक्कर

यशराज फिल्म्सचा वॉर 2, अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 2025मधील सर्वात जास्त उत्सुकता असलेला चित्रपट आहे. आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केलेला हा भव्य पॅन-इंडिया अ‍ॅक्शन स्पेक्टॅकल, यशराज फिल्म्सच्या फेमस वायआरएफ स्पाई यूनिवर्समधील सहावा भाग आहे, ज्यात आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर चित्रपटच आले आहेत. अयानने उघड केलं की, त्यांनी पूर्ण लक्ष वॉर 2च्या कथानक तयार करण्यावरच केंद्रित केलं, कारण त्यांना हृतिक रोशन आणि एनटीआर या दोन दिग्गजांना भिडवण्यासाठी तितकाच मोठा संघर्ष हवा होता.

अयान म्हणाला की, वॉर 2सारख्या एका अतिशय लोकप्रिय फ्रँचायझीला पुढे नेणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यावर स्वतःची छाप सोडणंही. वॉर 2चे दिग्दर्शन करणं ही माझ्यासाठी एक सुंदर संधी होती, जिथे मी पहिल्या चित्रपटाला सलाम करू शकलो. जर असं नसतं, तर अशा ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये काम करण्याचा काही उपयोग नाही. दिग्दर्शक म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो की, मी स्वतःला पूर्णपणे यात बुडवून टाकलं आहे, कारण प्रेक्षकांना एक नवीन मार्ग देणं गरजेचं आहे जे त्यांना हवंहवंसं वाटेल. वॉर 2मधील प्रत्येक गोष्ट खूप नियोजनपूर्वक तयार करण्यात आली आहे, जेणेकरून प्रेक्षकांचा थिएटरमधील अनुभव अधिक भव्य आणि थरारक होईल. सर्वाधिक वेळ आम्ही अ‍ॅक्शन सीन्स आणि कथानक, विशेषतः संघर्ष तयार करण्यात घालवला, जो हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील आमनेसामनेच्या भिडंतीस योग्य न्याय देईल.

अयान मानतो की, वॉर 2, हा एक चित्रपट नसून भारतीय सिनेमाची ताकद साजरा करणारा एक महोत्सव आहे. तो हृतिक आणि एनटीआर यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांना एकत्र आणतो आणि एक असा थरारक अनुभव देतो, जो प्रेक्षकांचा श्वास रोखून धरतो. हे खरंतर भारतीय सिनेमाचं एकत्र येणं आहे, जिथे हे दोन दिग्गज कलाकार एकत्र येत आहेत. आम्हाला माहीत होतं की या जोडीविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड अपेक्षा असतील आणि आम्ही प्रत्येक सेकंद याच विचारात घालवला की, प्रेक्षक जेव्हा थिएटरमध्ये बसतील, तेव्हा त्यांना आयुष्यातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव कसा देता येईल.

वॉर 2 हा चित्रपट येत्या 14 ऑगस्टला जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content