Homeचिट चॅटरामदास आठवले यांनी...

रामदास आठवले यांनी सलग ५व्या वर्षी दत्तक घेतला पँथर!

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सलग पाचव्या वर्षी मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजनेअंतर्गत रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते नुकतेच 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून पँथर दत्तक घेतला. दलित पँथरपासून पँथर ही ओळख असणारे नेते रामदास आठवले यांचे पँथर, या वन्यजीवावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सलग पाचव्या वर्षी पँथर बिबळ्या वाघ दत्तक घेतला.

निसर्गातील अन्नसाखळीमध्ये समतोल राखण्यात पँथर महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तसेच वन्य प्राण्यांवर प्रेम करा; निसर्गावर प्रेम करा; पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करा आणि वन संवर्धनासाठी निसर्गाचे आपण काही देणे लागतो या विचारातून आपण पँथर दत्तक घेतला असून ज्यांना शक्य आहे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन आठवले यांनी नंतर केले. यावेळी आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले उपस्थित होत्या. वनसंरक्षक आणि संचालक एस. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा पाचवा वाढदिवस केक कापून आणि बुद्धवंदना घेऊन साजरा करण्यात आला.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content