Homeचिट चॅटआयडियलतर्फे १६ वर्षांखालील...

आयडियलतर्फे १६ वर्षांखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्चला

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व सिबिईयु सहकार्याने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. यावेळी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शनदेखील लाभणार आहे.

ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे यंदापासून क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून एप्रिलमध्ये सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंना तेथे संधी लाभणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संघटन समितीचे प्रमोद पार्टे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २ मार्चपर्यंत संपर्क साधावा.  

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content