Homeचिट चॅटआयडियलतर्फे १६ वर्षांखालील...

आयडियलतर्फे १६ वर्षांखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्चला

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व सिबिईयु सहकार्याने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. यावेळी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शनदेखील लाभणार आहे.

ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे यंदापासून क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून एप्रिलमध्ये सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंना तेथे संधी लाभणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संघटन समितीचे प्रमोद पार्टे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २ मार्चपर्यंत संपर्क साधावा.  

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content