Homeचिट चॅटआयडियलतर्फे १६ वर्षांखालील...

आयडियलतर्फे १६ वर्षांखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्चला

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे १६ वर्षांखालील शालेय मुलामुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व सिबिईयु सहकार्याने ही स्पर्धा दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली. यावेळी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शनदेखील लाभणार आहे.

ही स्पर्धा चँम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने होईल. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डची मर्यादा राहील. आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे यंदापासून क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून एप्रिलमध्ये सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूंना तेथे संधी लाभणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संबंधित शालेय खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संघटन समितीचे प्रमोद पार्टे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २ मार्चपर्यंत संपर्क साधावा.  

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content