Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत...

उद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत कौटुंबिक नाते आहे का?

सांगा उद्धवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाहीत? तुमचे तुमच्या वहिनीसोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्ख्या भावाने आरोप केले की नाहीत?, असे सवाल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केले.

उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. त्यावर पलटवार करताना शेलार म्हणाले की, पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हालाही काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही? असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत तर अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील. मग तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा शेलार यांनी दिला. आम्ही “मेरी माटी मेरा देशवाले” आहोत. तुमच्यासारखे “माझे कुटुंब माझी जबाबदारी”वाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव

ज्यांची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आलीय, त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत. तुमचे खासदार सोडून गेले. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले. मग तुमची ग्रामपंचायतीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का? असा सवाल त्यांनी केला.

मुंबईत आलेले उद्योग पळवून लावायचे तुम्ही.. मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत. हे कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी दाखवले, अशी टीकाही शेलार यांनी केली.

“मी करणार म्हणजे करणारच…” आरक्षण देणार म्हणजे देणारच…! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच…! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच…! अशा गेल्या 10 वर्षांत 1 हजार 531 घोषणा तुम्ही केल्या. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षांतील भाषणे काढली. त्यामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उद्धव ठाकरे म्हणजे “पोकळ शब्दांचे खोडकळ नेते” आहेत, अशा शब्दांतही त्यांनी टीका केली.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content