Wednesday, March 12, 2025
Homeएनसर्कल'तुळशी' वाहू लागला!...

‘तुळशी’ वाहू लागला! पाण्याची चिंता कमी होणार!!

मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणि मुंबई महापालिका क्षेत्रातच असणारा महापालिकेचा  ‘तुळशी’ तलाव आज (१६ जुलै) सकाळी ११ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. याचाच अर्थ यंदा हा तलाव ११ दिवस आधीच भरून वाहू लागला आहे. तुळशी तलावाचे पाणी पिण्याकरीता वापरले जाते. त्यामुळे मुंबईकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोडा सौम्य होण्याची शक्यता आहे.

८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९मध्ये १२ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८मध्‍ये ९ जुलैला; वर्ष २०१७मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलाव मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे ४० लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा (८०४६ दशलक्ष लीटर) असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते.

१२ जूनला दुपारी पवई तलाव भरून वाहू लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ दिवस आधी हा तलाव भरून वाहिला. १८९०मध्ये ४० लाख रूपये खर्चून तो बांधण्यात आला होता. त्याचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे त्याचा प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापर केला जातो.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content