Homeहेल्थ इज वेल्थ'फिंगर बोल'मध्ये हात...

‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत हानीकारक!

आधुनिक जीवनपद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता ‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंतवैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री’ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ‘मेडियुष’ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘स्वच्छ मुख अभियान’ हा चांगला उपक्रम आहे, परंतु असे अभियान हे एक दिवस राबविण्याचे काम नाही. त्यासाठी प्रत्येकदा खाणे झाल्यानंतर चुळा भरुन तोंड धुण्याची पारंपरिक पद्धत टिकवणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘फिंगर बोल’मध्ये हात बुडवून धुणे यासारखे आधुनिक जीवनपद्धतीमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यास दंतवैद्यकांनी मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

वैद्यकीय सेवा हा एक पवित्र पेशा असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले. नवनवीन औषधे व तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसेच नवनवे आजारदेखील येत आहेत. कर्णाने आपले सोन्याचे दात काढून दान दिले होते अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते. डॉक्टरांनी रुग्णांना देव मानून सेवा करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

कार्यक्रमाला ‘मेडीयुष’चे सहसंस्थापक डॉ. गोविंद भताने, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, ‘ओरल हेल्थ मिशन’चे डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. विश्वेश ठाकरे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. अशोक ढोबळे, सौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्रतज्ज्ञ डॉ. संदेश मयेकर, कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.   

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content