Homeहेल्थ इज वेल्थ'फिंगर बोल'मध्ये हात...

‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत हानीकारक!

आधुनिक जीवनपद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता ‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंतवैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री’ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ‘मेडियुष’ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘स्वच्छ मुख अभियान’ हा चांगला उपक्रम आहे, परंतु असे अभियान हे एक दिवस राबविण्याचे काम नाही. त्यासाठी प्रत्येकदा खाणे झाल्यानंतर चुळा भरुन तोंड धुण्याची पारंपरिक पद्धत टिकवणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘फिंगर बोल’मध्ये हात बुडवून धुणे यासारखे आधुनिक जीवनपद्धतीमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यास दंतवैद्यकांनी मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

वैद्यकीय सेवा हा एक पवित्र पेशा असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले. नवनवीन औषधे व तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसेच नवनवे आजारदेखील येत आहेत. कर्णाने आपले सोन्याचे दात काढून दान दिले होते अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते. डॉक्टरांनी रुग्णांना देव मानून सेवा करावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

कार्यक्रमाला ‘मेडीयुष’चे सहसंस्थापक डॉ. गोविंद भताने, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, ‘ओरल हेल्थ मिशन’चे डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. विश्वेश ठाकरे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. अशोक ढोबळे, सौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्रतज्ज्ञ डॉ. संदेश मयेकर, कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.   

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content