Homeएनसर्कल.. तर डॉक्टरांना...

.. तर डॉक्टरांना गुन्हेगार मानले जाणार नाही!

कोणताही डॉक्टर रुग्णावर उपचार करताना त्याच्या मनात गुन्हेगारी हेतू नसतोच, या दृष्टिकोनाचा आयएमए नेहमीच पुरस्कार करित आलेली आहे. जोपर्यंत हानी पोहोचवण्याचा उद्देशच नसेल तोपर्यंत, वैद्यकीय अपघात किंवा अगदी निष्काळजीपणादेखील गुन्ह्याच्या मापदंडांना कसा पात्र होईल? जर वैद्यकीय व्यवसाय, अपघात किंवा निष्काळजीपणा या गुन्हयाच्या व्याख्येत बसत नसेल तर डॉक्टरांवर फौजदारी खटला चालवणे म्हणजे अतार्किक कारवाई होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास तो खून मानला जात असे आणि त्यांना शिक्षा केली जात असे. आम्ही एक दुरुस्ती आणणार आहोत, ज्यात डॉक्टरांना यातून मुक्तता किंवा सूट देण्यात येणार आहे, त्यासाठी इंडिअन मेडिकल असोसिएशननै (आयएमए) विनंती केली होती, अशी माहिती आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी दिली.

एकोणिसाव्या शतकातील वसाहतवादी कायद्याने होणारा अन्याय केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेमध्ये गुन्हेगारीच्या सीमा नव्याने परिभाषित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. भारतीय संसद या शतकानुशतके जुन्या अन्यायातून मुक्ती देणारा इतिहास घडवू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लॉर्ड डेनिंग यांनी म्हटल्याप्रमाणे या कायद्याने देशातील डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या डोक्यावर सतत कारवाईची टांगती तलवार असल्याच्या दडपणाखाली रुग्णावर उपचार करतील ते दडपण आता दूर होण्याच्या मार्गावर आहे, असेही ते म्हणाले.

डॉक्टर

या देशातील डॉक्टरांच्या दुर्दशेविषयी त्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. किंबहुना, वैद्यकीय समाजाला वसाहतवादी कायद्याच्या जाचक साखळीतून मुक्त झाल्यासारखे वाटेल. या निर्णयाचे परिणाम दूरगामी आणि रुग्णाच्या हितासाठी असतील. डॉक्टर पुन्हा एकदा गंभीर क्षणी, सर्वशक्तीनिशी, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी धोका पत्करण्यास मोकळे होतील. वैद्यकीय व्यावसायिक सहेतुक हानी पोहोचवण्याच्या विरोधातच काम करतात आणि जगभरातील त्यामुळेच गुन्हेगारी दायित्व नसण्याचा समर्थनार्थ असतील या ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम सीमांच्या पलीकडे जाईल आणि डॉक्टरांना गुन्हेगार म्हणून वागवण्याची पद्धत बदलेल, असेही त्यांनी सांगितले.

आयएमएने गेल्या काही वर्षात घेतलेल्या तत्वनिष्ठ भूमिकेला न्याय मिळाला आहे. आयएमए देशाच्या सेवेसाठी नेहमीच कटिबध्द आहे. कोविडची लढाई आयएमए आणि भारतातील वैद्यकीय समुदायाने सरकारच्या खांद्याला खांदा लावून लढली. भारत सरकारने मंजूर केलेल्या आणि भारतात उत्पादित केलेल्या कोविड लसींनी भारतातील साथीच्या रोगाचा प्रसार थोपवला. तद्वतच एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयएमए भारत सरकारसोबत कायमच होती, आहे आणि असेल, असे उद्गार डॉ. दिनेश ठाकरे यांनी काढले. त्यावेळी उपाध्यक्ष डॉ. अनिल आव्हाडदेखील उपस्थित होते. भारतातील वैद्यकीय व्यवसायासाठी होऊ घातलेल्या क्रांतिकारी बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आयएमए महाराष्ट्र राज्याचे सचीव डॉ. सौरभ संजानवाला यांनी आभार मानले आहेत.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content