Homeपब्लिक फिगरपिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीची जबाबदारी सध्या विलास लांडेंकडेच

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे शहराध्यक्ष यांनी काल आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज थेट पिंपरी-चिंचवडचे सर्किट हाऊस गाठले. तेथे त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली आणि पिपरी चिंचवडमध्ये पक्षांतर्गत सुरू झालेली पडझड थोपवण्याची जबाबदारी सध्यातरी माजी आमदार विलास लांडे यांच्यावर सोपवली असल्याचे कळते.

काल शरद पवार यांच्या उपस्थितीत अजय गव्हाणे यांच्याबरोबर पिंपरी परिसरातले जवळजवळ २० माजी नगरसेवकही त्यांच्या पक्षात दाखल झाले. त्यामुळे विधानसभेची ही जागा आता गव्हाणे लढवणार असल्याची चिन्हे दिसू लागली. पर्यायाने येथून इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. विधानसभेत पवार गटाला मतदान करायचे की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी हे कार्यकर्ते आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळेच काल खासदार अमोल कोल्हे यांनी आपला जनता दरबार पुढे ढकलला होता.

बैठकीनंतर अजित पवार यांनी ट्विट केले. गेल्या अनेक दशकांपासून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड  शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत,  त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास पवार यांनी या ट्विटद्वारे केला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content