Friday, March 14, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजरोजच्या प्रदूषणावर 'बांबू...

रोजच्या प्रदूषणावर ‘बांबू लावणे’ हाच उपाय! 

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बांबू लागवड यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला तर कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्तर नसेल.. पण तरीही राज्यात बांबू लागवडीला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जाणार आहे.

अजित पवार यांनी ही घोषणा शुक्रवारी त्यांच्या ६३ मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आणि दहा हजार हेक्टर (पंचवीस हजार एकर) खासगी क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे, हेही जाहीर केले. या योजनेअंतर्गत बांबूच्या एका रोपापोटी बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला १७५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सुरुवातीला नंदूरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे.

बांबू

अजित पवार यांनी ही घोषणा केली खरी पण त्यातील बांबूच्या उल्लेखानंतर सभागृहात हंशा उसळला. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघत खुणेनेच त्यांना इशारा केला की बघा, अर्थमंत्री काय सांगताहेत.. त्यावर खुणेनेच मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिले की हे जे काही आहे, ते तुमच्यासाठीच आहे.. त्यावर सभागृहात पुन्हा हंशा उसळला आणि अजित पवार मात्र गंभीरपणे त्यांचे लेखी भाषण वाचत बांबू लागवडीच्या प्रोत्साहनाचा प्लान वाचत होते.

अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेतही बांबू लागवडीचा विषय चर्चिला गेला. शिवसेनेचे संजय राऊत यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी त्यांच्यावर टीका केली. बांबू लागवडीचा उल्लेख करत ते म्हणाले की, रोज सकाळी सकाळी महाराष्ट्रात प्रदूषण सुरू होते.. म्हणजे ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणही सुरू होते. बांबू इतर वनस्पतींपेक्षा २० टक्के जास्त प्राणवायू सोडतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो. त्यामुळे या रोजच्या प्रदूषणावर बांबूमुळे उपाय होऊ शकेल.

बांबू

संजय राऊत यांच्या सर्व टिव्हीवाल्यांना बाईट देत सुरू होणाऱ्या दिवसाचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन प्रदूषण या शब्दाला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेतही पुन्हा एकच हंशा उसळला.

Continue reading

दारूतून मिळणाऱ्या पैशातून २५ लाख देणार का?

राज्याला दारूतून दरवर्षी ३० हजार पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आणि रस्ते अपघातातले ७० टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होत असतात. मग रस्ते अपघातात प्राण गमावणाऱ्या व्यक्तींना आणि जखमींना दारुपासून मिळणाऱ्या महसुलातून प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई देणार...

अजितदादांनी पुन्हा एकदा दिली फटकळ, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची प्रचिती

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या फटकळ आणि मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्याची झलक त्यांनी सुमारे सत्तर मिनिटांच्या आपल्या भाषणातही दाखवली. इतकेच नव्हे तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या वेळीही त्यांनी...

.. जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला सुरेश भटांच्या ओळींचा आधार

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शाब्दिक चिमटे काढणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जोरदार टीका केली. ती करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे..., या कवितेचा आधार घेतला आणि विरोधकांसह संपूर्ण सभागृह...
Skip to content