Thursday, October 24, 2024
Homeपब्लिक फिगर'राष्ट्रवादी'चा दिमाखदार आणि...

‘राष्ट्रवादी’चा दिमाखदार आणि देखणा ‘स्वराज्य सप्ताह’ सुरू..

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक अशी सगळी भूमिका पार पाडली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी काल केला.

ज्या जिजाऊंनी जन्माला घातले… त्यांना वाढवलं… त्यांच्यावर संस्कार केले…. चांगले सल्ले दिले… त्यांना घडवण्याचे काम जिजाऊंनी केले ही बाब ध्यानात घ्या… असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान… अस्मिता… लढाऊ बाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आपले अभिमान आणि स्वाभिमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करुन स्वतःचे आरमार… जलदूर्ग उभारले. त्यांच्या कार्यप्रेरणेतूनच गेली चार दशके महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या पराक्रमाची पताका सर्वदूर फडकत असताना आपण पाहात आहोत. छत्रपतींनी महाराष्ट्रातील दुर्गम डोंगरदऱ्या, कडेकपारीमध्ये अठरापगड जातीला… मावळ्यांना… बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांच्यात स्वराज्य निर्मितीची चेतना जागवून खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. आपल्याला महाराजांच्या विचारांवर वाटचाल करायची आहे असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी केले.

स्वराज्य

सर्वांचा आदर करायला शिकवणारा राजा अशी महाराजांची ओळख आहे. अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले… स्वाभिमानाने जगायला शिकवले… काळ्या आईची सेवा करायला शिकवले… प्रत्येक माताभगिनींचा मानसन्मान शिकवला… अडचणीत असलेल्यांना मदत करायला शिकवले… आपल्या देशावर… राज्यावर आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवले… याची काळजी घ्यायला शिकवले… आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसर्‍या धर्माचा आदर सन्मान करायची शिकवण दिली… पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत जगलेल्या अंधारात चाचपडणार्‍या समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवले… लढायला आणि आत्मविश्वासाने उभं करायला शिकवले असेही त्यांनी सांगितले.

स्वराज्य

आपल्याला महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवायचा आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्या काळात, साडेतीनशे वर्षापूर्वी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. जागतिक दर्जाचे एक मॅनेजमेंट गुरू असू शकतात याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. रयतेची काळजी घेणारा एक महान राजा म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाजी महाराज भोगवादी राजा नव्हे तर खरे रयतेचे राजे होते शेतकऱ्यांचे कैवारी… कलावंताचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात कृतीत आणली, असेही अजितदादा म्हणाले.

स्वराज्य

आपल्या राजाने महाल नाही तर गडकिल्ले उभारले -छगन भुजबळ

महाराजाच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया आपल्या महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजूटीने, एकदिलाने काम करुया. आपला राजा बहुजनांचा मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा होता. आपले भाग्य आहे की हा राजा आपल्या मातीत जन्मला आला असे उद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले. रयतेचा राजा कसा होता हे सांगता आले पाहिजे. हा राजा स्वार्थासाठी कधी लढला नाही तर अन्यायाविरुध्द लढला. आपल्या राजाने महाल नाही तर गडकिल्ले उभे केले. ही खरी आपली संपत्ती आहे असेही ते म्हणाले.

या स्वराज्य यात्रेत सर्वधर्मियांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष विचार घेऊन पुढे जायचे आहे. शिवभक्त या सप्ताहात सहभागी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ काल मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे झाला. गेटवे ऑफ इंडिया येथे आगमन होताच राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन केले. शिवज्योत आणि पताका देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा, शिवगीते सादर करण्यात आली.

मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी यावेळी स्वराज्य सप्ताहाची माहिती दिली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवा नेते पार्थ पवार, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content