Tuesday, March 11, 2025
Homeपब्लिक फिगरदेशावरचे संकट आजही...

देशावरचे संकट आजही कायम!

देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले.

काल आपण स्वातंत्र्यदिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे? महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेच्या  माध्यमातून पोहोचले पाहिजे. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबतची भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. कारण आताच्या सरकारच्या विचारधारेला संविधानाची अडचण आहे, असे ते म्हणाले.

संकट

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मागे  बसवले होते. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळीत होती. आज राहुल गांधी यांची प्रतिष्ठा गेली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले होते. विरोधी पक्षनेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, असेही पवार म्हणाले. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा सरकारचा प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्षे तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होते. आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगले सरकार आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content