Tuesday, March 11, 2025
Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्रात सुरू होणार...

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना देईल आणि उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देणारे केंद्र असेल. ते कौशल्य विकास, तांत्रिक नवकल्पना आणि धोरण तयार करण्यावरदेखील लक्ष केंद्रित करेल. त्यासाठी स्थापित टास्क फोर्समध्ये शैक्षणिक, उद्योग आणि सरकारमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. त्यात IIT मुंबई आणि IIM मुंबईचे संचालक, Google India, Mahindra Group आणि L&T सारख्या संस्थांचे

आर्टिफिशियल

प्रतिनिधी आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि डेटा सुरक्षा परिषद ऑफ इंडियाचे तज्ज्ञदेखील टास्क फोर्सचा भाग आहेत. टास्क फोर्सने दोन बैठका घेतल्या आहेत आणि विद्यापीठाच्या स्थापनेचा रोडमॅप अंतिम करण्याचे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

देशातील हे पहिले एआय विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र असेल. उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला चालना देईल. हा उपक्रम केवळ महाराष्ट्राला एआयमध्ये जागतिक आघाडीचे स्थान देणार नाही तर भारताच्या तांत्रिक प्रगतीतही योगदान देईल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला. राज्यातले नवे एआय विद्यापीठ शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करणारी संस्था तयार करण्यावर काम करेल. हा उपक्रम भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याशी सुसंगत आहे, ज्यामध्ये विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधोरेखित करण्यात आला होता, असे शेलार म्हणाले.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content