Homeन्यूज ॲट अ ग्लांसमुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंची पवारांना गळ

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मेळाव्याला उपस्थित असलेले शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणीही येथेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करावी, आपला त्याला पाठिंबा राहील. तशी घोषणाच आपण करू, असे ते म्हणाले.

ठाकरे

भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्याची पुनरावृत्ती आता आम्हाला नको आहे. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे जाहीर केले जायचे. एकमेकांच्या पायावर धोंडे मारण्याकरीता आम्ही हेच धोरण वापरायचो. तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल, म्हणून आम्ही त्यांच्या जागा पाडायचो आणि ते आमची जागा पाडायचे असे व्हायचे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिले नव्हते. महाविकास आघाडीत तसे होऊ नये, म्हणून आधीच मुक्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला १० हजार रुपये महिना दिले जाजतात. त्यासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्षे काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केले, आम्ही काय केले यावर… लाडकी बहीण योजना आणली. पण पैसा कुठे आहे? सरकार पाडायला ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये दिले जात आहेत, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले. कोरोनामध्ये मी या समाजासाठी काम केले. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळीही आम्ही मुस्लिमांसोबत होतो. पंतप्रधान मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणले आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केले नाही? आमचे खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, कारण मी दिल्लीत होतो. वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडवाकडे होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर आम्ही त्याला विरोध करू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content