Tuesday, March 11, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसमुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंची पवारांना गळ

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मेळाव्याला उपस्थित असलेले शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणीही येथेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करावी, आपला त्याला पाठिंबा राहील. तशी घोषणाच आपण करू, असे ते म्हणाले.

ठाकरे

भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्याची पुनरावृत्ती आता आम्हाला नको आहे. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे जाहीर केले जायचे. एकमेकांच्या पायावर धोंडे मारण्याकरीता आम्ही हेच धोरण वापरायचो. तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल, म्हणून आम्ही त्यांच्या जागा पाडायचो आणि ते आमची जागा पाडायचे असे व्हायचे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिले नव्हते. महाविकास आघाडीत तसे होऊ नये, म्हणून आधीच मुक्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला १० हजार रुपये महिना दिले जाजतात. त्यासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्षे काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केले, आम्ही काय केले यावर… लाडकी बहीण योजना आणली. पण पैसा कुठे आहे? सरकार पाडायला ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये दिले जात आहेत, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले. कोरोनामध्ये मी या समाजासाठी काम केले. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळीही आम्ही मुस्लिमांसोबत होतो. पंतप्रधान मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणले आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केले नाही? आमचे खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, कारण मी दिल्लीत होतो. वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडवाकडे होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर आम्ही त्याला विरोध करू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content