Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेची पथके...

मुंबई महापालिकेची पथके रायगड व कोल्हापूरला रवाना

रायगड आणि कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून काल रात्री दोन पथके मुंबईहून रवाना झाली. यात आरोग्य आणि जल तसेच घनकचरा व्यवस्थापनविषयक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई महापालिका आपत्कालीन परिस्थितीत पालिका क्षेत्राबाहेरदेखील तत्परतेने मदतकार्य करीत असते. याच अनुषंगाने काल मुंबई महापालिकेची २ पथके रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त  (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचा एक पथक रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदतकार्य करण्यास रवाना झाले आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोईंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. वैद्यकीयविषयक बाबींचे व्यवस्थापन पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक कार्यवाही पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्साःरण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पालिकेची आणखी एक टीम कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

२०१९मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही महापालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content