Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेची पथके...

मुंबई महापालिकेची पथके रायगड व कोल्हापूरला रवाना

रायगड आणि कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून काल रात्री दोन पथके मुंबईहून रवाना झाली. यात आरोग्य आणि जल तसेच घनकचरा व्यवस्थापनविषयक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई महापालिका आपत्कालीन परिस्थितीत पालिका क्षेत्राबाहेरदेखील तत्परतेने मदतकार्य करीत असते. याच अनुषंगाने काल मुंबई महापालिकेची २ पथके रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त  (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचा एक पथक रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदतकार्य करण्यास रवाना झाले आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोईंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. वैद्यकीयविषयक बाबींचे व्यवस्थापन पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक कार्यवाही पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्साःरण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पालिकेची आणखी एक टीम कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्रीदेखील पाठविण्यात आली आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

२०१९मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही महापालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content