Homeटॉप स्टोरीपंतप्रधान मोदींची अशी...

पंतप्रधान मोदींची अशी माफी मान्य नाही!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधान नरेंद्न मोदींनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. आम्हाला अशी माफी मान्य नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने मुंबईत हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांनी पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचाराला पांघरूण घालण्यासाठी माफी मागितली? महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. ते कोसळले नाहीत. भ्रष्टाचारामुळे राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना घडली.

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. विधानसभा निवडणुकांचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, अतुल लोंढे आदी सहभागी झाले होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला.

1 COMMENT

  1. खरेच ओढून ताणून मागितल्यासारखी माफी वाटते. नाहीतर पहिल्याच दिवशी मागितली असती. निवडणूक असल्यामुळे माफी मागण्या शिवाय पर्यायच नाही.

Comments are closed.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content