Homeब्लॅक अँड व्हाईटशेअर बाजार गडगडला,...

शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी गेले!

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांच्या घसरणीसह ८० हजारांच्या खाली गेला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक जवळपास ५०० अंकांनी घसरला. या मोठ्या घसरणीत काही मिनिटांतच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

जागतिक पातळीवर घडामोडींचा परिणाम म्हणून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहयला मिळाली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीने जागतिक शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग दुसऱ्या सत्रात घसरले. सुरुवातीच्या व्यवसायात वाहन क्षेत्रावर खूप दबाव होता. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्समध्ये प्रत्येकी चार टक्क्यांनी घसरण झाली.

शेअर

बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या आठवड्यात जागतिक बाजारांवर लक्ष केंद्रित केले जाईल, कारण दीर्घ कालावधीनंतर जागतिक शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील तणावाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या आहेत. जपानमध्येही शेअर बाजारात घसरण झाली आहे. जपानमध्ये गेल्या ३५ वर्षांतील ही सर्वाधिक मोठी पडझड आहे. जपानमधील शेअर बाजार घसरणीचे हे प्रमाण आठ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीमुळे ही स्थिती उभी ठाकली आहे.

अर्थतज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील ही पडझड युद्धामुळे झाली असे म्हणता येणार नाही. कारण युद्धामुळे शेअर बाजार गडगडला म्हणायचं झालं तर तेलाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला असता. तेलाचे भावदेखील गडगडले आहेत. तेलाचे भाव गडगडणे हे मंदीच्या भीतीचे द्योतक आहे. त्यामुळेच गेल्या आठवड्यात अमेरिकेत पडझड झाली. त्याचे आता आशियाई बाजार पडत आहेत. भारतातही शुक्रवारी पडझड पाहायला मिळाली, असे विश्लेषण अर्थतज्ज्ञ अजित फडणीस यांनी केले आहे.

शेअर

भारतीय शेअर बाजारातील पडझड इतर देशांच्या तुलनेत कमी झाली आहे. एका उच्चाकांवरून काहीशी करेक्शन्स येणं हे बाजाराच्या पुढच्या वाटचालीसाठी चांगली बाब असते. बाजाराला निमित्त हवे असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भयभीत होण्याचं काही कारण नाही. त्यांनी बाजारात आपली गुंतवणूक व्यवस्थित राखावी. दबावात येऊन भीतीने शेअर्सची विक्री करू नये. पाऊस पडल्यानंतर जसा लख्ख प्रकाश पडतो, तसा हा प्रकार आहे. त्यामुळे धीर धरावा. बाजारात खरेदीला पुन्हा एकदा संधी लाभली तर त्याचा लाभ घ्यावा असे मला वाटते, असेही फडणीस यांनी सांगितले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content