Monday, October 28, 2024
Homeटॉप स्टोरीदेशातल्या 8 लोकसभा...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत.

याचा तपशील पुढीलप्रमाणे:

लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच एवं सत्यापन के लिए प्राप्त आवेदनों का सार
क्रम.सं.राज्य का नामदूसरे या तीसरे स्थान के उम्मीदवार से अनुरोध प्राप्त हुए (पार्टी संबद्धतायदि कोई हो)संसदीय निर्वाचन क्षेत्र का नामविधानसभा क्षेत्र का नामजांच और सत्यापन के लिए चयनित मतदान केंद्रों की संख्या
1आंध्र प्रदेशवाईएसआरसीपीविजयनगरमबोब्बिली1
नेल्लीमार्ला1
कुल2
2छत्तीसगढकांग्रेसकांकेरसंजारी बालोद2
गुंदरदेही1
सिहावा1
कुल4
3हरियाणाभारतीय राष्ट्रीय कांग्रेसकरनालकरनाल2
पानीपत शहर2
फरीदाबादबडकल2
कुल6
4महाराष्ट्रभारतीय जनता पार्टीअहमदनगरशेवगांव5
राहुरी5
पार्नेर10
अहमदनगर शहर5
श्रीगोंदा10
    कर्जत जामखेड5
कुल40
5तमिलनाडुभारतीय जनता पार्टीवेल्लोरवेल्लोर1
अनाईकट1
केवी कुप्पम1
गुडियाथम1
वानियमबाडी1
अम्बुर1
डीएमडीकेविरुधनगरविरुधनगर14
 कुल20
6तेलंगानाभारतीय जनता पार्टीज़ाहिराबादनारायणखेड़7
ज़ाहिराबाद7
एंडोले (एससी)6
कुल20


एकूण राज्ये– 6

एकूण संसदीय मतदारसंघ- 8

एकूण मतदान केंद्रे– 92

राज्य विधानसभाओं के आम चुनाव 2024ईवीएम जांच और सत्यापन के लिए प्राप्त आवेदनों का सार 
क्रम. सं.राज्य का नामदूसरे या तीसरे स्थान के उम्मीदवार से अनुरोध प्राप्त हुए (पार्टी संबद्धतायदि कोई हो)विधानसभा क्षेत्र का नामजांच और सत्यापन के लिए चयनित मतदान केंद्रों की संख्या
1आंध्र प्रदेशवाईएसआरसीपीगजपतिनगरम1
वाईएसआरसीपीओंगोल12
कुल13
2ओडिशाबीजदझारसुगुडा13
कुल राज्य – 2कुल विधानसभा क्षेत्र – 3कुल मतदान केंद्र – 26
          

एकूण राज्ये– 2

एकूण विधानसभा मतदारसंघ- 3

एकूण मतदान केंद्रे- 26

भारतीय निवडणूक आयोगाने 1 जून 2024च्या आपल्या आदेशाद्वारे अर्जप्रक्रिया, तपासल्या जाणाऱ्या युनिट्ससाठीचे प्रोटोकॉल, तपासणी/पडताळणी प्रक्रियेसाठी सुरक्षा आणि नियंत्रण आणि आवश्यक कागदपत्रे, याबाबतचे तपशीलवार प्रशासकीय मानक कार्यप्रणाली जारी केली होती. यानुसार संबंधित राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) उत्पादकांना, आयोगाला सूचित केलेल्या अर्जदारांची एकत्रित यादी, निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत म्हणजेच 4 जुलै 2024पर्यंत कळवणे आवश्यक आहे. सीईओंनी यापूर्वीच वेळापत्रकाच्या 15 दिवस आधी उत्पादकांना ही सूचना दिली आहे.

जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार आणि कायदेशीर स्थितीनुसार, सीईओंद्वारे संबंधित उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडून, वरीलप्रमाणे निवडलेल्या, संबंधित मतदारसंघात दाखल केलेल्या निवडणूक याचिकांच्या स्थितीची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया 4 आठवड्यांच्या आत सुरू करता येईल. निवडणूक याचिका (EP) दाखल करण्याची मुदत सध्याच्या निवडणुकीच्या आवर्तनामध्ये म्हणजेच निकाल जाहीर झाल्यापासून 45 दिवस इतकी आहे.

ईव्हीएम युनिट्सची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासण्यासाठी आणि पडताळणीसाठी पद्धती आणि टप्पे ठरवणारी तांत्रिक मानक कार्यप्रणाली आयोगाकडून निवडणूक याचिका कालावधी संपण्यापूर्वी योग्य वेळी जारी केली जाईल. संबंधित सीईओंकडून ईपी (EP)ची सद्यःस्थिती प्राप्त झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत उत्पादक ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीसाठी वेळापत्रक जारी करतील. निवडणूक याचिकेच्या स्थितीची स्थिती समजल्यावर 4 आठवड्यांच्या आत युनिट्सची तपासणी आणि पडताळणी सुरू होईल.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content