Homeहेल्थ इज वेल्थ17 सप्टेंबरपासून 17...

17 सप्टेंबरपासून 17 कोटींहून जास्त लोकांची 7 आजारांची तपासणी!

आयुष्मान भव कार्ड, आभा कार्डांची निर्मिती, आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण योजना आणि असंसर्गजन्य रोग, क्षय, सिकल सेल आदी विविध रोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागांत 17 सप्टेंबर 2023 पासून आरोग्य मेळावे भरवण्यात आले. या काळात 17 कोटींपेक्षा जास्त (17,26,66,845) लोकांनी क्षय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाच्या कर्करोग आदी सात प्रकारच्या आजारांच्या चाचण्या करून घेतल्या आहेत. 16 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 86,19,636 लोकांनी या सात रोगांच्या चाचण्यांचा लाभ घेतला आहे.

देशातील तळागाळातील लोकसंख्येपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी गुजरातमधल्या गांधीनगर इथून दूरदृश्य माध्यमातून ‘आयुष्मान भव’ पोर्टलचे उद्घाटन केले व अभियानाला सुरुवात केली. अभियानाला सुरुवात झाल्यापासून आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये भरवलेल्या 12.6 आरोग्य मेळाव्यांना 16 डिसेंबर 2023 पर्यंत10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावल्याची नोंद झाली आहे.

सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये 34,107 आरोग्य मेळावे भरवण्यात आले असून त्यामध्ये एकूण 1,37,84,954 लोकांनी नोंदणी केली.

देशातील तळागाळातील प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेतून ‘आयुष्मान भव’ उपक्रम साकारला आहे. त्याद्वारे देशातील प्रत्येक गाव, शहरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

तपासणी

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content