Homeचिट चॅटजयपूरमध्ये झाली दुसरी...

जयपूरमध्ये झाली दुसरी गिरनार एलिव्हेट समिट

गिरनार एलिव्हेट समिटच्या गतवर्षीच्या दणदणीत यशानंतर कारदेखो समूहाने या परिषदेचे दुसरे पर्व गिरनार एलिव्हेट समिट २०२४ नुकतेच आयोजित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात कंपनीचे मुख्यालय असलेल्या जयपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्दिष्ट अमित जैन यांनी शार्क टँक इंडिया व अन्य माध्यमांतून गुंतवणूक केलेल्या ३०हून अधिक कंपन्यांचे सक्षमीकरण हे होते.

या परिषदेत विविध क्षेत्रांतील सत्रे घेण्यात आली. भारत २.० उभारण्याच्या दृष्टीने कंपनी संस्थापकांशी व्यक्तीश: जोडून घेण्याबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याबद्दल जैन यांची सखोल बांधिलकी यातून अधोरेखित होते. गुंतवणूक केल्यानंतर कंपन्यांना वाढ व यश साध्य करण्यासाठी आवश्यक तो आराखडा आखण्यामध्ये मार्गदर्शन व मेंटॉरशिप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गिरनार एलिव्हेट समिट या कंपन्यांना त्यांचे ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी तसेच यशस्वी व्यवसाय उभे करण्याची धोरण सफाईदार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ पुरवते.

गिरनार

कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन म्हणाले की, माझे उद्दिष्ट पैशाच्या स्वरूपातील गुंतवणुकीच्या पलीकडे आहे. भारताच्या वाढत्या उद्योजक प्रतिभेची जोपासना करण्याच्या तसेच तिला मार्गदर्शन करण्याच्या बांधिलकीने मी प्रेरित आहे. त्याचप्रमाणे गाभ्याच्या स्थानी तंत्रज्ञान असलेल्या ‘नवभारताला’ संप्रेरणा देण्यासाठी वचनबद्ध आहे. संस्थापकांशी व्यक्तिगत संबंध जोडल्यामुळे त्यांची दृष्टी व आव्हाने समजून घेण्यात मदत होते असे मला वाटते. गिरनार एलिव्हेट समिटसारखे उपक्रम उद्योजकांना जाणवणारे अडथळे ओळखण्यास व त्यावर मात करण्यात संप्रेरकाची भूमिका पार पाडतात. त्यांना तज्ज्ञांकडून तसेच सहयोगींकडून शिकण्याची क्षमता देतात. त्याचप्रमाणे बाजारपेठेशी अनुकूल उत्पादने, निधीउभारणीची सुयोग्य धोरणे आणि बचावात्मक स्पर्धात्मक भंडार यासारखी महत्त्वाची अंगे विकसित करण्यासाठी आवश्यक उपाय अधिक सफाईने करण्यातही उद्योजकांना मदत करतात.

ब्रॅण्ड्सना सक्षम करून भारताच्या उद्योजकता परिसंस्थेत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात मदत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी उद्योजकांना व्यवसाय उभे करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी आवश्यक ते बारकावे समजून घेण्याची संधी देणारी वैविध्यपूर्ण सत्रे घेण्यात आली. कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन यांच्या व्यवसायांचा आवाका वाढवण्याविषयीच्या माहितीपूर्ण सत्राने परिषदेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी कायदा, वित्तपुरवठा, नियमांचे पालन व एचआर (मनुष्यबळ विकास) या विषयांवरील सत्रे घेण्यात आली.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content