Homeचिट चॅटजयपूरमध्ये झाली दुसरी...

जयपूरमध्ये झाली दुसरी गिरनार एलिव्हेट समिट

गिरनार एलिव्हेट समिटच्या गतवर्षीच्या दणदणीत यशानंतर कारदेखो समूहाने या परिषदेचे दुसरे पर्व गिरनार एलिव्हेट समिट २०२४ नुकतेच आयोजित केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात कंपनीचे मुख्यालय असलेल्या जयपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेचे उद्दिष्ट अमित जैन यांनी शार्क टँक इंडिया व अन्य माध्यमांतून गुंतवणूक केलेल्या ३०हून अधिक कंपन्यांचे सक्षमीकरण हे होते.

या परिषदेत विविध क्षेत्रांतील सत्रे घेण्यात आली. भारत २.० उभारण्याच्या दृष्टीने कंपनी संस्थापकांशी व्यक्तीश: जोडून घेण्याबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याबद्दल जैन यांची सखोल बांधिलकी यातून अधोरेखित होते. गुंतवणूक केल्यानंतर कंपन्यांना वाढ व यश साध्य करण्यासाठी आवश्यक तो आराखडा आखण्यामध्ये मार्गदर्शन व मेंटॉरशिप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. गिरनार एलिव्हेट समिट या कंपन्यांना त्यांचे ज्ञान अधिक सखोल करण्यासाठी तसेच यशस्वी व्यवसाय उभे करण्याची धोरण सफाईदार करण्यासाठी उत्तम व्यासपीठ पुरवते.

गिरनार

कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन म्हणाले की, माझे उद्दिष्ट पैशाच्या स्वरूपातील गुंतवणुकीच्या पलीकडे आहे. भारताच्या वाढत्या उद्योजक प्रतिभेची जोपासना करण्याच्या तसेच तिला मार्गदर्शन करण्याच्या बांधिलकीने मी प्रेरित आहे. त्याचप्रमाणे गाभ्याच्या स्थानी तंत्रज्ञान असलेल्या ‘नवभारताला’ संप्रेरणा देण्यासाठी वचनबद्ध आहे. संस्थापकांशी व्यक्तिगत संबंध जोडल्यामुळे त्यांची दृष्टी व आव्हाने समजून घेण्यात मदत होते असे मला वाटते. गिरनार एलिव्हेट समिटसारखे उपक्रम उद्योजकांना जाणवणारे अडथळे ओळखण्यास व त्यावर मात करण्यात संप्रेरकाची भूमिका पार पाडतात. त्यांना तज्ज्ञांकडून तसेच सहयोगींकडून शिकण्याची क्षमता देतात. त्याचप्रमाणे बाजारपेठेशी अनुकूल उत्पादने, निधीउभारणीची सुयोग्य धोरणे आणि बचावात्मक स्पर्धात्मक भंडार यासारखी महत्त्वाची अंगे विकसित करण्यासाठी आवश्यक उपाय अधिक सफाईने करण्यातही उद्योजकांना मदत करतात.

ब्रॅण्ड्सना सक्षम करून भारताच्या उद्योजकता परिसंस्थेत स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कंपन्यांमध्ये त्यांचे रूपांतर करण्यात मदत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. परिषदेच्या पहिल्या दिवशी उद्योजकांना व्यवसाय उभे करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी आवश्यक ते बारकावे समजून घेण्याची संधी देणारी वैविध्यपूर्ण सत्रे घेण्यात आली. कारदेखो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन यांच्या व्यवसायांचा आवाका वाढवण्याविषयीच्या माहितीपूर्ण सत्राने परिषदेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी कायदा, वित्तपुरवठा, नियमांचे पालन व एचआर (मनुष्यबळ विकास) या विषयांवरील सत्रे घेण्यात आली.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content