Homeब्लॅक अँड व्हाईटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळः देवांश, नीलसह सरदाना विजयी

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षांखालील शालेय बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकर, नील भट, रेयांश जैन यांनी अपराजित राहून सर्वाधिक ५ साखळी गुणासह निर्विवाद विजेतेपद पटकाविले. सरदाना मिरी, शानया दोशी, आस्या चव्हाण यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुद्धीबळ संघटना सहकार्यित स्पर्धेप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व बुद्धीबळपटूंच्यावतीने विशेष गौरव कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षांखालील बुद्धीबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकरने (५ गुण) प्रथम, वेद मीलनने (४.५ गुण) द्वितीय, विराज बदानीने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये सरदाना मिरीने (३ गुण) प्रथम, समीरा थोरातने (३ गुण) द्वितीय, जिवी गालाने (२.५ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला. १० वर्षांखालील मुलांमध्ये नील भटने (५ गुण) प्रथम, रेयांश  त्रिवेदीने (४ गुण) द्वितीय, आशय महाजनने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये शानया दोशीने (३ गुण) प्रथम, शरण्या महेश्वरीने (३ गुण) द्वितीय, वेदा फुरीयाने (२ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. १२ वर्षांखालील गटात मुलांमध्ये रेयांश जैनने (५ गुण) प्रथम, वेदांत मगरेने (३.५ गुण) द्वितीय, दीप फुणगेने (३.५ गुण ) तृतीय आणि मुलींमध्ये आस्या चव्हाणने (३.५ गुण) प्रथम पुरस्कार जिंकला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content