Homeबॅक पेजसना, रोहित, मनोज...

सना, रोहित, मनोज ठरले सर्वोत्तम लिफ्टर!

मुंबईच्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि उत्कर्ष व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला व पुरुष, ज्युनियर आणि सिनियर अनइक्युप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिला गटात नवी मुंबईची सना अशपाक मुल्ला, ज्युनियर विभागात मुंबई उपनगरचा रोहित पाटेकर आणि सिनियर पुरुष गटात दि मुंबईचा मनोज मोरे यांनी सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला.

सिनेकलावंत शशिकांत खानविलकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचा बक्षिस समारंभ आरएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय राऊत आणि महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे मानद सचिव सैदल सोंडे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे सर्वसाधारण महिला गटाचे सांघिक विजेतेपद मुंबई उपनगर संघाने मिळवले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते-

ज्युनियर मुली: ओवी सोंडे, सलोनी पांचाळ, पूर्वा सावंत, रिया गुजर, वाश्रवी देवलेकर, प्रणाली हुमाले

सिनियर महिला: श्रिया यादव, शागुप्ता शेख, प्रियांका जसानी, सना मुल्ला, अमिशा

ज्युनियर मुले: अजय थेरडे, करण रेवर, सिद्धार्थ निलेकर, रोहित पाटेकर, महादेव कबीर, सोहम राठोड

सिनियर पुरुष: प्रसाद कदम, जयदीप मोरे, किरण जगदाळे, अक्षय कारंडे, कुणाल राठोड, सागर महाडेश्वर, मनोज मोरे

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content