Homeबॅक पेजसना, रोहित, मनोज...

सना, रोहित, मनोज ठरले सर्वोत्तम लिफ्टर!

मुंबईच्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि उत्कर्ष व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला व पुरुष, ज्युनियर आणि सिनियर अनइक्युप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिला गटात नवी मुंबईची सना अशपाक मुल्ला, ज्युनियर विभागात मुंबई उपनगरचा रोहित पाटेकर आणि सिनियर पुरुष गटात दि मुंबईचा मनोज मोरे यांनी सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला.

सिनेकलावंत शशिकांत खानविलकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचा बक्षिस समारंभ आरएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय राऊत आणि महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे मानद सचिव सैदल सोंडे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे सर्वसाधारण महिला गटाचे सांघिक विजेतेपद मुंबई उपनगर संघाने मिळवले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते-

ज्युनियर मुली: ओवी सोंडे, सलोनी पांचाळ, पूर्वा सावंत, रिया गुजर, वाश्रवी देवलेकर, प्रणाली हुमाले

सिनियर महिला: श्रिया यादव, शागुप्ता शेख, प्रियांका जसानी, सना मुल्ला, अमिशा

ज्युनियर मुले: अजय थेरडे, करण रेवर, सिद्धार्थ निलेकर, रोहित पाटेकर, महादेव कबीर, सोहम राठोड

सिनियर पुरुष: प्रसाद कदम, जयदीप मोरे, किरण जगदाळे, अक्षय कारंडे, कुणाल राठोड, सागर महाडेश्वर, मनोज मोरे

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content