Homeबॅक पेजसना, रोहित, मनोज...

सना, रोहित, मनोज ठरले सर्वोत्तम लिफ्टर!

मुंबईच्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि उत्कर्ष व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला व पुरुष, ज्युनियर आणि सिनियर अनइक्युप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिला गटात नवी मुंबईची सना अशपाक मुल्ला, ज्युनियर विभागात मुंबई उपनगरचा रोहित पाटेकर आणि सिनियर पुरुष गटात दि मुंबईचा मनोज मोरे यांनी सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला.

सिनेकलावंत शशिकांत खानविलकर यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचा बक्षिस समारंभ आरएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनय राऊत आणि महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे मानद सचिव सैदल सोंडे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे सर्वसाधारण महिला गटाचे सांघिक विजेतेपद मुंबई उपनगर संघाने मिळवले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते-

ज्युनियर मुली: ओवी सोंडे, सलोनी पांचाळ, पूर्वा सावंत, रिया गुजर, वाश्रवी देवलेकर, प्रणाली हुमाले

सिनियर महिला: श्रिया यादव, शागुप्ता शेख, प्रियांका जसानी, सना मुल्ला, अमिशा

ज्युनियर मुले: अजय थेरडे, करण रेवर, सिद्धार्थ निलेकर, रोहित पाटेकर, महादेव कबीर, सोहम राठोड

सिनियर पुरुष: प्रसाद कदम, जयदीप मोरे, किरण जगदाळे, अक्षय कारंडे, कुणाल राठोड, सागर महाडेश्वर, मनोज मोरे

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content