Homeन्यूज अँड व्ह्यूजरोहित पाटलांनी सार्थ...

रोहित पाटलांनी सार्थ केले आरआर आबांचे नाव..

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील तथा आरआर आबा आपल्या प्रभावी वक्तृत्त्वशैलीसाठी प्रसिद्ध होते. राज्याच्या विधानसभेत आर आर पाटील यांनी अनेकदा आपल्या प्रभावी भाषणांमधून सभागृहाची दाद मिळवली होती. नुकतीच पंचविशी गाठलेल्या त्यांच्या चिरंजीवांनी सोमवारी विधानसभेतील पहिले भाषण करताना थेट आर आर पाटलांची आठवण सर्वांना करून दिली आणि मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सभागृहाची दाद मिळवली.

आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पोटनिवडणुकीतून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतरच्या २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित वयाने लहान असल्याने सुमनताई पाटील पुन्हा विधानसभेवर निवडून गेल्या. मात्र, यावेळी २०२४च्या विधानसभा निवडणुकीतून रोहित पाटील पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

आरआर

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत मांडला होता. त्यावर भाषण करताना रोहित पाटील यांनी आपले विधानसभेतील पहिलेच भाषण गाजविले. नार्वेकर यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील म्हणाले की, अध्यक्षमहोदय आपण एक वकील आहात आणि सभागृहात एक क्रमांकावर बसणाऱ्या वकिलांकडे (देवेन्द्र फडणवीस) आपले लक्ष असणारच आहे. पण मीही वकिली शिकत असल्याने तुम्ही माझ्यावरही लक्ष ठेवाल, अशी मी आशा करतो. रोहित पाटील यांच्या टिप्पणीला अध्यक्ष नार्वेकर आणि मुख्यमंत्री फणवीस यांच्यासह सर्वच सदस्यांनी दाद दिली.

मुख्यमंत्र्यांकडे निर्देश करत रोहित पाटील म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली एक ओळ मला आठवते. ती म्हणजे, अमृताहूनी गोड नाम तुझे देवा… पाटील पुढे म्हणाले की, तुमचे नाव गोड आहे. त्यावर आपल्या जागेवर बसल्याबसल्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी टिप्पणी केली की, अमृताहूनही गोड आहे… त्यावर पाटील म्हणाले की, त्यामुळेच तुम्ही तुमची गोड दृष्टी माझ्यावरही ठेवाल, हा मला विश्वास आहे.

रोहित पाटील यांच्या या टिप्पणीनंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

रोहित पाटील यांनी मोजक्याच शब्दांत भाषण केले. पण त्याचा ठसा त्यांनी उमटवला. त्यामुळेच सभागृह गाजवणाऱ्या आर आर पाटलांची सर्वांनाचा आठवण झाली.

Continue reading

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...
Skip to content