Homeकल्चर +चेंबूर जिमखाना कॅरमः...

चेंबूर जिमखाना कॅरमः रियाझ अकबर अली चौथ्या फेरीत

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीने मुंबईच्या दीपक कांबळेवर २५-२०, २५-१८ अशी सरळ दोन सेटमध्ये मात करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे मुंबईच्या कौस्तुभ जागुष्टेने मुंबई उपनगरच्या सुहास पोमेंडकरवर तीन सेटमध्ये १३-२५, २४-१४, २५-७ असा विजय मिळवून आगेकूच केली. 

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-

निलांश चिपळूणकर (मुंबई) वि वि विजय टेमघरे (रायगड)

ब्लेसिंग सॅमी (ठाणे) वि वि खान इस्माईल महम्मद इब्राहिम (मुंबई उपनगर)

संजय मांडे (मुंबई) वि वि जावेद सय्यद (मुंबई उपनगर) 

अभिजित त्रिपनकर (पुणे) वि वि रमेश देवकुळे (ठाणे)

सिद्धांत वाडवलकर (मुंबई) वि वि लियाकत नागरजी (मुंबई)

विवेक पोदार (मुंबई) वि वि विपुल बाबारिया (मुंबई)

विवेक कांबळे (मुंबई उपनगर) वि वि तेजस म्हात्रे (मुंबई)

असगर शेख (मुंबई उपनगर) वि वि कुलदीप वाघधरे (मुंबई)

रहीम खान (पुणे) वि वि महेंद्र वाघ (मुंबई)

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content