Homeपब्लिक फिगरपूजा चव्हाण मृत्यूबाबत...

पूजा चव्हाण मृत्यूबाबत राज्यपालांना साकडे!

पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी होत असलेला पोलीस तपास संदिग्ध असून पूजाला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली.

चित्रा वाघ यांनी राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे एक निवेदन दिले. पूजा चव्हाणच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. तिने आत्महत्त्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला, असे पोलीस म्हणत आहेत. तिच्या आई-वडिलांनी आमची कोणाविरूदध तक्रार नाही असे म्हटले आहे. मात्र, तिची आजी आणि भावाने पूजा आत्महत्त्या करणारी मुलगी नव्हती. तिची हत्त्या झाली असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप बाहेर आल्या असून त्यात पूजाला आत्महत्त्येपासून परावृत्त करण्याच्या प्रयत्नांपासून आत्महत्त्येनंतर दरवाजा तोड, पण मोबाईल ताब्यात घे, सांगण्यापर्यंतच्या संभाषणाचा समावेश आहे. हा आवाज राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे. पूजा राठोड त्यांच्या संपर्कात होती, याचे काही फोटोही दिसत आहेत. इतके ढळढळीत पुरावे असताना पुणे पोलीस मात्र संजय राठोडविरूद्ध कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. राठोड अद्याप बेपत्ता आहेत, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय हा अहवाल तयार करण्यात आला. राठोड यांच्या चौकशीशिवाय हा अहवाल कसा काय तयार केला जाऊ शकतो? पूजाचा लॅपटॉप, मोबाईल, पोलिसांना मिळाले का, त्यातून काही माहिती समोर आली का, ऑडिओ क्लिपची तपासणी झाली का, पूजासोबत राहणाऱ्या दोघांची जुजबी चौकशी करून पोलिसांनी त्याना कसे काय जाऊ दिले, सध्या हे दोघेही फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असे वाघ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी याप्रकरणाच्या चौकशीत लक्ष घालण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content