Homeपब्लिक फिगरपरदेशात भाषणे ठोकणाऱ्या...

परदेशात भाषणे ठोकणाऱ्या राहुल गांधींना ही माहिती नाही?

मुळात ईव्हीएम मशीन कुठल्याही मोबाईलला जोडला जात नाही. कोणताच ईव्हीएम मोबाइलनं ऑपरेट होत नाही. राहुल गांधी परदेशात टेक्नॉलॉजीवर भाषणं देतात. त्यांना याची माहिती नाही का?, असा सवाल शिवसेनेचे उपनेते संजय निरूपम यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आल्यानंतर वायकर यांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. राहुल गांधी, अदित्य ठाकरे अखिलेश यादव यांनी तसे ट्विटही केले आहे. त्यानंतर निरूपम यांनी हे आरोप फेटाळून लावले.

राहुल

ईव्हीएम मोबाईलने अनलॉक केला गेला असे सांगितले जात आहे. निकालाच्या दिवशीदेखील असेच खोटे आरोप करण्यात आले. दोन हजार मतांनी अमोल कीर्तिकर जिंकले असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. यानंतर ईव्हीएम मशीनवर कीर्तिकर याना एक मत जास्त मिळाले म्हणून ते विजयी  म्हणून घोषणा करण्यात आली. हे सारे माध्यमांवर चालू होते. त्यावेळी पोस्टल मते मोजण्यात आलेली नव्हती. पोस्टल मते मोजल्यावर वायकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

कोणीतरी तिथे मोबाईल घेऊन गेले होते असे सांगण्यात आले आहे. आता हा मोबाईल कुणाचा होता? वायकर यांच्या मेहुण्याचा आहे का? याची चौकशी करायला हवी. एक ईव्हीएम मशीन या मोबाइलला जोडण्यात आले होते. त्यावर ओटीपी आला होता. मूळात ईव्हीएम मोबाईलला जोडताच येत नाही. त्याला इंटरनेट नसते. त्यामुळे ओटीपीने ते ऑपरेटच करता येत नाही. ज्यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे तेदेखील असे बोलतात हे हास्यास्पद आहे, असे निरूपम म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content