Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 74!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74वा वाढदिवस साजरा करत असून आजच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेl. यानिमित्त आज पंतप्रधान मोदी ओरिसामध्ये घरांच्या एका भव्य योजनेचे भूमिपूजन करणार आहेत.

देशभरात भारतीय जनता पार्टीकडून आज पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा केला जात आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यानिमित्त एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आहेत.

पंतप्रधान

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या शंभर दिवसांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. या काळात 15 लाख कोटींच्या विविध योजना चालू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी गुजरातमधल्या एका लहानशा खेड्यातल्या गरीब परिवारात जन्मलेले व्यक्तिमत्व असून गेली तीस वर्षे ते भारतीय राजकारणात महत्त्वाची पदे भूषवत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते पंतप्रधान राहिलेले आहेत. हे त्यांचे अकरावे वर्ष आहे. साठ वर्षांनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले नेते आहेत. 14 विविध देशांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कदाचित जगातले पहिलेच पंतप्रधान असतील.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content