Homeन्यूज अँड व्ह्यूजनागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत...

नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती मुर्मू झाल्या सहभागी!

महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच सहभागी झाल्या.

कोणत्याही देशाच्या विकासात, संशोधन आणि नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विद्यापीठातील प्राध्यापक सदस्यांना भारतीय पेटंट कार्यालयाने 60 हून अधिक पेटंट मंजूर केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर आहे. स्थानिक समस्या आणि गरजा लक्षात घेऊन नवोन्मेष आणि संशोधन करण्याचे आणि त्या नवकल्पनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना केले.

आज संपूर्ण जग हे एक जागतिक गावच झाले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कोणतीही संस्था जगापासून तुटून राहू शकत नाही. त्यांनी नागपूर विद्यापीठाला आंतरशाखीय अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. संशोधन आणि नवोन्मेष एकमेकांशी सामायिक करूनच आपण जगासमोरील आव्हानांचा सामना करू शकतो यावर त्यांनी भर दिला.

कोणत्याही संसाधनांचा उपयोगही केला जाऊ शकतो किंवा त्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो असे तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हेच लागू होते. जर आपण त्याचा योग्य वापर केला तर तो देशासाठी आणि समाजासाठी फायदेशीर ठरेल आणि जर आपण त्याचा गैरवापर केला तर तो मानवतेसाठी हानिकारक ठरेल. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपले जीवन सोपे करत आहे. पण डीपफेकसाठी त्याचा वापर करणे हा समाजासाठी धोका आहे. नैतिक शिक्षण आपल्याला मार्ग दाखवू शकते असे त्यांनी सांगितले.

औपचारिक पदवी मिळवणे हा शिक्षणाचा शेवट नाही, विद्यार्थ्यांनी जिज्ञासू राहिले पाहिजे आणि शिकत राहिले पाहिजे. आज  तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, तेव्हा सतत शिकत राहणे आणखी महत्त्वाचे ठरते असे राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

विद्यार्थी हे देश आणि समाजाची संपत्ती आहेत. भारताचे भविष्य त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येऊ शकते परंतु त्यांनी त्यांस घाबरू नये. ज्ञान आणि आत्मविश्वासाने अशा परिस्थितींचा सामना करावा, प्रियजनांच्या संपर्कात राहावे आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा असा सल्ला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला.

Continue reading

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...
Skip to content