Homeपब्लिक फिगररस्तेमार्गाने दरेकर पोहोचले,...

रस्तेमार्गाने दरेकर पोहोचले, पण तलाठ्याचाही पत्ता नाही!

महाड तालुक्यातल्या तळये गावात दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावणारी अशी घटना या गावात घडली. मी आता त्या गावातच आहे. आमच्या सोबत माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार निरंजन डावखरेसुद्धा उपस्थित आहेत. काल सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली, पण आज दुपारपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी, किंबहुना गावाचा तलाठीसुद्धा घटनास्थळी पोहोचला नाही, हे इथल्या ग्रामस्थांचे दुर्दैव आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.

मुंबईहून पाऊसपाण्याची तमा न बाळगता अत्यंत खडतर प्रवास करत अत्यंत बिकट परिस्थितीत मार्ग काढत रस्ते मार्गाने दरेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे हे नेते महाडच्या तळये गावापर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर प्रसिदधीमाध्यमांशी ते बोलत होते.

आज सांगतात संपर्क साधू शकत नाही. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. परंतु दळणवळणेला चालना देत महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफची टीम उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुलं मदतीला आली. दिलासा देण्याचं काम त्या तरुणांनी केलं, ग्रामस्थांना स्थलांतर करत त्यांनी तेथून बाहेर काढले. परंतु प्रशासकीय अधिकारी पोहोचला नाही ही शरम वाटणारी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

अनेक दिवसापासून हवामान अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट दिला असून  आम्हीसुद्धा सांगितलं होते की, कोकणात सुविधा बळकट करा. त्यांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आले नाही. त्यामुळे हे जीव गेले. अगोदरच जर टीम आली असती तर आज हे निष्पाप जीव वाचले असते. परंतु प्रशासनाची एव्हढी बेपर्वाई ज्यांनी लोकांचे जीव घेण्यापर्यंत कधीच काही पाहिलं नाही. सरकार ५ लाख देतील, १० लाख देतील. परंतु गेलेले जीव परत येणार  नाही, असेही दरेकर म्हणाले.

प्रशासनाचा प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचले नव्हते. आता टीम आणि प्रशासकीय कर्मचारी पोहोचले. त्यामुळे नंतर मदत करण्यापेक्षा पंचनामे करून घ्या, मदत पुरवा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, असे आवाहन प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content