Homeडेली पल्स'पोर्ट ब्लेअर' झाले...

‘पोर्ट ब्लेअर’ झाले आता ‘श्री विजयपुरम’!

अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून “श्री विजयपुरम” ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी या निर्णयाची घोषणा केली. ‘X’वर एका पोस्टमध्ये गृहमंत्री म्हणाले की, देशाला वसाहतवादी प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज आम्ही पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून “श्री विजयपुरम” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वीच्या नावाला वसाहतवादी वारसा होता. श्री विजयपुरम हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान आणि निकोबार बेटांनी बजावलेल्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे. अंदमान आणि निकोबार बेटांना आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात अतुलनीय स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचे नौदल तळ म्हणून भूमिका बजावलेला हा प्रदेश आज आपल्या धोरणात्मक आणि विकास आकांक्षांसाठी महत्त्वाचा आधार बनण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच ठिकाणी सर्वप्रथम आपला तिरंगा फडकावला आणि सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला ते हेच ठिकाण आहे, असेही अमित शाह म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह  यांच्या Xवरील ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, “श्री विजयपुरम” हे नाव अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या वीर लोकांप्रति आदरांजली आहे आणि वसाहतवादी वारशांपासून मुक्त होण्याचे प्रतीक आहे. श्री विजयपुरम, हे नाव अंदमान आणि निकोबार बेटांच्या समृद्ध इतिहास आणि वीर लोकांचा सन्मान आहे. वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी आणि आपला वारसा साजरा करण्याप्रति आपली वचनबद्धता ते प्रतिबिंबित करते.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content