Homeपब्लिक फिगर‘रण’ उत्सवाला भेट...

‘रण’ उत्सवाला भेट देण्याचे पंतप्रधान मोदींचे अमिताभना आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना गुजरातमधल्या येत्या “रण” उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

ट्विटरवर ट्विट करताना अमिताभ बच्चन यांनी कैलाश पर्वताला भेट देऊ न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. कैलाश पर्वत माझ्याकरीता नेहमीच धार्मिक, कुतुहलास्पद राहिला आहे. परंतु आजपर्यंत मी प्रत्यक्ष तेथे जाऊ शकलो नाही, याचे दुःख आहे, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तोच धागा पकडून पंचप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अमिताभ बच्चन यांना ‘रण’ महोत्सवाला तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले आहे. माझी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरांची भेट खरोखरच मंत्रमुग्ध करणारी होती. येत्या आठवड्यात, गुजरातमध्ये ‘रण’ उत्सव सुरू होत आहे. मी तुम्हाला कच्छला भेट देण्याची विनंती करतो. स्टॅच्यू ऑफ युनिटीलापण तुम्ही नक्की भेट द्या, से पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रण

फ्रेंच अंतराळवीराच्या भारत भेटीबद्दल व्यक्त केला आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक ट्विट करत फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट यांच्या भारत भेटीबद्दलही आनंद व्यक्त केला. थॉमस पेस्केट, आपण भारतात आलात आणि विशेषत्वाने विज्ञान, अवकाश आणि नवोन्मेष या क्षेत्रांत आमच्या तरुणांचा उत्साह आणि जिवंतपणा अनुभवला, याबद्दल आनंद वाटला, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वतः लिहिलेले गरबा गाणेही केले शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, नवरात्रीच्या आगमनाला, त्यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेले गरबा गाणे शेअर केले. मीटब्रॉस आणि दिव्या कुमार यांनी या गरबा गाण्याला आवाज आणि संगीत दिले आहे. आपल्यामध्ये शुभ नवरात्रीचे आगमन होत असताना, गेल्या आठवड्यात मी लिहिलेले गरबा गाणे सादर करताना मला आनंद होत आहे. उत्सवाच्या या तालात आपण सर्वजण न्हाऊन जाऊयात! मी, या गरब्याला आवाज आणि संगीत दिल्याबद्दल मीटब्रॉस तसेच दिव्या कुमार यांचे आभार मानतो, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content