Tuesday, February 4, 2025
Homeकल्चर +काही ग्रहांमधील योगाच्या...

काही ग्रहांमधील योगाच्या स्थित्यंतराने येते नैसर्गिक आपत्ती!

प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी नक्षत्रांचे गुणधर्म ओळखून सत्त्वगुणी नक्षत्रांना देवगणी, राजसिक नक्षत्रांना मनुष्यगणी आणि तमोगुणी नक्षत्रांना राक्षसगणी अशा संज्ञा दिल्या आहेत. राक्षसगणी नक्षत्रे ही व्यक्तीगत सौख्याच्या दृष्टीने साधारणपणे प्रतिकूल ठरतात. परंतु कर्तृत्त्व, अधिकार, प्रतिष्ठा आणि भौतिक उत्कर्ष यादृष्टीने अनुकूल ठरतात. मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषात राक्षसगणी नक्षत्रांची (कृत्तिका, धनिष्ठा, मूळ इत्यादी तमोगुणी नक्षत्रांची) भूमिका महत्त्वाची ठरते. गुरू, शनि, हर्षल आदी मोठ्या ग्रहांमधील योग जेव्हा राक्षसगणी नक्षत्रांमध्ये होतात, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती, राजकीय स्थित्यंतरे, युद्ध अशा घटना घडतात, असे प्रतिपादन ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी नुकतेच केले.

ते ऑनलाईन ‘ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर बोलत होते. ‘फल ज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे’ यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. गेल्या ५०-६० वर्षांत भारतात घडलेल्या ठळक घटनांचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून वेध घेताना आम्हाला लक्षात आले, असेही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी सांगितले.

ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरू  डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्रात संशोधन कार्य चालू आहे. जानेवारी २०२०पर्यंत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने देशभरात १४हून अधिक ज्योतिष अधिवेशनांमध्ये ज्योतिषशास्त्रावरील निबंध सादर करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्‍या काही वर्षांत भारतासह जगभरात भीषण आपत्काळ येणार आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादींच्या माध्यमातून मोठा जनसंहार होण्याची शक्यता आहे. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना करणे हाच एकमेव उपाय आहे. कलियुगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे, असे अनेक संतांनी सांगितले आहे, असेही कर्वे म्हणाले.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content